केंद्र शासनाने नागरिकांच्या सुविधेसाठी लोकसभा मतदारसंघनिहाय सुरू केली पासपोर्ट कार्यालये
नगर – पूर्वी पासपोर्ट काढायचा म्हटलंकी पुण्याला जावे लागायचे. तिथे अर्ज दिला की दीड दोन महिन्यांनी पोस्टमनची वाट पाहायची तेव्हा कधी पुन्हा महिनाभराने पासपोर्ट मिळायचा. त्यातूनही एखादी त्रुटी निघालीच तर पुन्हा पुण्याच्या खेट्या मारायच्या. परदेश गमन करू इच्छिणाऱ्यांसाठी पासपोर्ट इतक जिकीरीचं काम दुसर कुठलंच नसायचं पण आता परीस्थिती बदलतेय. पासपोर्ट कार्यालय गेल्या वर्षी पोस्ट खात्यात समाविष्ट झाल्यापासून तब्बल 8000 नागरिकांनी पोस्ट खात्यातून आपला पासपोर्ट काढला आहे.
गेल्यावर्षी 27 मार्च 2018 ला तत्कालीन खा. दिलीप गांधी यांनी पोस्टातल्या पासपोर्ट कार्यालयाचं उद्घाटन केले. त्यानंतर या पासपोर्ट कार्यालयाला गती मिळाली. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री असतांना त्यांच्या कडे एक शिष्ट मंडळ गेलं तेव्हा त्यांना समजले की पुण्यातील पासपोर्ट कार्यालय हे 12 जिल्ह्यासाठी आहे. त्यानंतर त्यांनी दिल्लीत जावून प्रत्येक जिल्हासाठी एक पासपोर्ट कार्यालय उघडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रत्येक लोकसभा मतदार संघासाठी एक कार्यालय सुरू करण्यात आले. त्यानुसार नगरला 27 मार्च 2018 ला तर श्रीरामपूरला 22 फेब्रुवारी 2019 ला खा. सदाशिव लोखंडे यांच्या हस्ते पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
पासपोर्ट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रांची जंत्री मोठी असते पत्याचा पुरावा महत्वाचा, पुन्हा त्याची चारित्र्यपडताऴणी करावी लागते. हे सगळी प्रक्रिया वेळखाऊ असून त्याकरता अधिक कालावधी लागतो त्यासाठी पासपोर्ट कार्यालयाने ऑन लाईन पद्धतीने अर्ज नोंदणी केली जाते. त्यानंतर ऑनलाईनवरूनच कागदपत्रांची पूर्ततेविषयीची माहिती देतात. त्यानंतर ऑनलाइन अपॉइंटमेंट दिली जाते. रोह 9 ते5.30 यावेऴेत तेही एकेदिवशी केवळ 50 लोकांनाच बोलविण्यात येत असल्याने अर्ज दाराला पुरेसा वेळ देता येतो.या वेळीच त्यांच्या बोटांचे ठसे व अन्य प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन साठी प्रकरण पोलिसांकडे सोपविले जाते. व्हेरिफिकेशन नंतर पासपोर्ट पोस्टाने आपल्या पत्त्यावर पाठविला जातो.
पासपोर्ट घपोच करण्याचे कामही पोस्टामार्फतच केले जात असल्याने या कामात आत मोठीच सुसूत्रता आली आहे. पूर्वी प्रमाणे पासपोर्टसाठी पूण्याला खेट्या घालाण्या साठी लागणारा वेळ, पैसा यांची बचत झाल्याने नगरकरांनी सुस्कारा सोडला आहे. नगर -श्रीरामपूर विभागातून गेलावर्षभरात 8411 नागरिकांनी आपले पासपोर्ट काढले आहेत.