मुंबई : मुंबईजवळ तारापूर रासायनिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्यात झालेल्या स्फोटात शनिवारी सायंकाळी आठ जण मरण पावल्याची भीती व्यक्त होत आहे. पोलसांनी मृतांची संख्या नेमकेपणाने रात्री उशीरापर्यंत जाहीर केली नव्हती.
कारखान्यात उत्पादन सुरू असताना हा स्फोट झाला. त्यात अन्य किमान पाच जण गंभीर गंभीर जखमी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य विज वितर मंडळाचे उपकार्यकारी अभियंता लक्ष्मण राठोड म्हणाले, कोळवडे फिडर क्षेत्रात ट्रानस्फॉर्मरवर ऍल्युमिनियमची शिट उडून पडल्याने स्पार्किंग होत आहे, असा फोन संध्याकाळी सातच्या सुमारास आला. त्यामुळे त्या भागातील वीज पुरवठा स्वयंचलीत पध्दतीने खंडीत झाला. मात्र आम्ही उत्तर भागात जाणारा वीज पुरवठा सुरक्षात्मक उपाय योजना म्हणून खंडित केला. त्यामूळे 200 कारखान्यांचा वीज पुरवठा खंडित झाला.
भोईसर एमआयडीसी, पालघर नगर पालिका, तारापूर अणूशक्ती केंद्र यांचे अग्नीामक बंब घटनास्थळी रवाना झाले आहेत. या कंपनीत अल्युमिनीयम नायट्रेट बनवण्यात येते. या स्फोटाचा आवाज डहाणू आणि पालघरमध्ये 25 किमी परिसरात ऐकू आला, असे नागरिकांनी सांगितले.