चंद्रपूर : चंद्रपूरमधील ब्रह्मपुरी येथे झालेल्या वाघाच्या शिकार प्रकरणी वनखात्याने काही आरोपींना अटक केली. ब्रह्मपुरी विभागात एका वाघाचा मृत्यू झाल्याचे 12 जानेवारीला उघडकीस आले होते. नव्या वर्षात महाराष्ट्रात झालेला हा पहिला व्याघ्र मृत्यू होता.
धक्कादायक बाब अशी या वाघाची शिकार करून त्याचे डोक आणि पंजे कापण्यात आले होते. तपासाअंती वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी गाय मालक बाजीराव मसाखेत्री आणि गुराखी राकेश झाडे यांना अटक करून वाघाचे डोके आणि जाळलेले पायांचा शोध लावला आहे.
या प्रकरणी कसून चौकशी आणि विचारपूस केली असता आरोपी गुराख्यांकडून त्यांचा साथीदार यशवंत बोबाटे याचे नाव समोर आले. बोबाटेला अटक केल्यानंतर प्रकरणात आणखी पाच आरोपींची नावे उघडकीस आहे. त्यानंतर पोलिसांनी नारायण नागपुरे, बंडू पाल, दादाजी नवघडे, चक्रधर हुलके आणि यशवंत चिमुरकर यांनाही अटक करण्यात आली.
या आरोपींकडून पोलिसांनी मृत वाघाची 18 पैकी 13 नखं आणि चारपैकी तीन सुळे जप्त केले आहेत.तसेच पाच नखं आणि एक दात आरोपींनी जाळून टाकला असे चौकशीत समोर आले आहे.