कराची : पाकिस्तानने सोमवारी दशकभरानंतर मायदेशात झालेली श्रीलंकेविरूध्दची दोन सामन्यांची मालिका १-० ने जिंकली. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे कार्याध्यक्ष एहसान मानी यांनी पाकिस्तानपेक्षा भारतात क्रिकेट खेळण्यात अधिक धोका असल्याचे म्हणत अकेलेचे तारे तोडले आहेत.
मानी म्हणाले की, ” पाकिस्तान हा सुरक्षित देश आहे हे आम्ही दाखवून दिले आहे. सध्या तर भारतातच पाकिस्तानपेक्षा सुरक्षेच्या बाबतीत अधिक धोका आहे.
दरम्यान, पाकिस्तानात श्रीलंकेच्या क्रिकेट संघावार सन २००९ मध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे. त्यानंतर जगभरातील अनेक क्रिकेट संघांनी पाकिस्तान दौऱ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विराष्ट्रीय क्रिकेट २०१२मध्ये अखेरचे खेळले गेले. त्यावेळी पाकिस्तान संघ भारतात आला होता. त्यात दोन टी-२० व तीन वनडे लढतींचा समावेश होता.