नवी दिल्ली – नीती आयोगाने बांबू विकास या विषयावर राष्ट्रीय पातळीवरील एक कार्यशाळा आयोजित केली आणि हा उद्योग विकसीत करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे राज्यमंत्री ( स्वतंत्र कार्यभार) डॉ जितेंद्र सिंह, नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार, नीती आयोगाचे सदस्य डॉ व्ही. के.सारस्वत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यावेळी उनस्थित होते.
बांबू उद्योगातील संधी आणि आव्हाने यावर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. बांबू क्षेत्रातील संपूर्ण मूल्यसाखळीतील काही राहिलेले दुवे शोधून, ते जोडण्यासाठी नवी धोरणे आणि आराखडा निश्चित करण्यात आला.
उत्पादन, मूल्य वर्धन आणि बांबूविषयी आंतरराष्ट्रीय अनुभव, सरकारी धोरणे, कार्यक्रम आणि विविध क्षेत्रातील संधी, बांबू क्षेत्रातील चक्राकार अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील, या क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धती या विषयावर चर्चा झाली.
बांबूचा वापर आणि व्यावसायिकीकरण वाढवण्यासाठी, नीती आयोग काही आधुनिक, व्यावहारिक धोरणे/तंत्रज्ञान अमलात आणण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहे, ज्यातून भारतीय बांबू व्यवसायाचा सर्वसमावेशक विकास शक्य होईल.
बांबू क्षेत्रात असलेल्या क्षमता आणि संधी यांचं शोध घेऊन त्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्थेत अधिकाधिक रोजगार निर्मितीचा नीती आयोगाचा प्रयत्न आहे. ज्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे, मूल्यवर्धनात सुधारणा आणि निर्यातीला चालना देण्यासाठी, बांबू उत्पादनांमध्ये वैविध्य आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.