बॅंकेत दरवर्षी आर्थिक साक्षरता सप्ताहसाजरा करण्यात येतो. अर्थसाक्षरता, सायबर सुरक्षा अशा महत्त्वांच्या विषयावर ग्राहकांना जागरूक केले जाते.
बॅंक ग्राहकांना बॅंकिंग व आर्थिक क्षेत्रात साक्षर करण्याकरिता सतत प्रयत्नशील असते. बॅंक सभासद व खातेदारांसाठी डिजिटल पेमेंट प्रोसेस व घ्यावयाची काळजी या विषयावर ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करीत असते. यामध्ये मोबाइल तसेच इंटरनेट यांचा वापर करत असताना सायबर गुन्हे कसे घडतात व असे गुन्हे घडू नये म्हणून कोणती दक्षता घेण्यात यावी याबाबत तज्ज्ञ व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येते.
दरवर्षी आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा करण्यात येतो. या काळात बॅंकेचे सभासद व खातेदार यांना तसेच विविध कार्यालये, दुकाने, व्यावसयिक यांच्याकडे जाऊन डिजिटल व्यवहारांबाबत माहिती देण्यात येते. त्याचप्रमाणे कर्जाची नियमित परतेड करण्याचे फायदे व महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात येते. सुवर्णमहोत्सवी वर्षात अशा प्रशिक्षणांची संख्या वाढविण्याची व ती शाखा स्तरावर आयोजित करण्याचे नियोजन आहे.
बॅंक सभासदांना सजग आणि अर्थसाक्षर करण्यासाठी घेत असलेले कार्यक्रम अतिशय उपयुक्त असल्याचे अनेक सभासदांनी सांगितले आहे. सध्या आपण तंत्रज्ञानावर अवलंबून आहोत. आपल्या दररोजच्या जीवनातील भरपूर गोष्टी या मोबाइल, संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्सवर अवलंबून आहेत. सध्या बेकायदेशीर हॅकिंग तसेच ऑनलाईन फसवेगिरी या प्रकारात खूप वाढ झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाला इतरांपासून स्वत:चा डेटा, बॅंक खाती सुरक्षित ठेवण्याची गरज वाढली आहे.
सायबर क्राइमसारख्या समस्या जगात सर्व ठिकाणी वाढतच आहेत. विविध बॅंका, आरोग्य सेवा, वित्तीय संस्था, कंपन्या या इंटरनेटशी कनेक्ट असलेली उपकरणे वापरतात. त्यामुळे त्यांच्याकडे असलेल्या संवेदनशील माहितीला सुद्धा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सायबर सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची तसेच काळाची गरज बनली आहे.
बॅंकेच्या कामकाजाचे संगणकीकरण झाल्यानंतर वेळो-वेळी त्वरित ग्राहक सेवेबरोबरच बॅंकेने डेटा सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. बॅंकेकडून चेलळश्रश इरपज्ञळपस, एउो., खचझड, णझख, छएऋढ, ठढड, एउड इ. ऊळसळींरश्र डर्शीींळलशी खातेदारांना दिल्या जातात.
बॅंकेच्या खातेदारांची वैयक्तिक माहिती तसेच आर्थिक व्यवहार सुरक्षित रहाण्याच्या हेतूने बॅंकेचे स्वत:चे डेटा सेंटर असून त्यामध्ये डशर्लीीळीूं अंतर्गत विविध उपाय योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. बॅंकेच्या डेलळरश्र चशवळर (ऋरलशलेज्ञ, ढुळीींशी) तसेच थशलीळींश वर विविध पोस्ट द्वारे खातेदारांना सायबर सुरक्षिततेचे महत्त्व, मोबाईल, संगणक वापरताना काय करावे आणि करु नये याबाबत सांगितले जाते.
बॅंक दरवर्षी सभासद, खातेदारांकरिता सायबर क्षेत्रातील तज्ज्ञांकडून सायबर जागरुकता प्रशिक्षण कार्यक्रम घेते. एटीएम कार्ड घेणाऱ्या प्रत्येक खातेदाराला ते कसे वापरावे तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने वेळोवेळी माहिती दिली जाते. बॅंक सायबर सुरक्षेसंबंधाने भारतीय रिझर्व्ह बॅंकेने घालून दिलेल्या नियमांचे पालन करते. ग्राहकांचा विश्वास तसेच त्यांचे सायबर सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रबोधन करणे हे बॅंकेने कर्तव्य मानले आहे.