मुंबई – अंतिम वर्षाची परीक्षा होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. अशात विरोधकांकडून बॅकलॉग व व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. याच मुद्द्यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
आशिष शेलार म्हणाले कि, सुर्याचे ग्रहण सुटले विद्यार्थ्यांचे ‘ग्रहण’ काही सुटत नाही. उच्च शिक्षण मंत्र्यांच्या अहंकाराचे ‘कंकण’ काही तुटत नाही. त्यामुळे एटीकेटीसह तमाम विद्यार्थी मित्र हो!
चला आता ‘सरकारचे संकटमोचन’ शिवसेना नेते संजय राऊत यांचा धावा करु या! या ‘शैक्षणिक जगबुडी’ पासून तुम्हीच वाचवा!, अशी टीका त्यांनी केली आहे.
सुर्याचे ग्रहण सुटले विद्यार्थ्यांचे “ग्रहण” काही सुटत नाही.
उच्च शिक्षण मंत्र्यांच्या अहंकाराचे “कंकण” काही तुटत नाही.
त्यामुळे
ATKT सह तमाम विद्यार्थी मित्र हो!
चला आता “सरकारचे संकटमोचन” मा. @rautsanjay61 यांचा धावा करु या!
या”शैक्षणिक जगबुडी” पासून तुम्हीच वाचवा!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 23, 2020
दरम्यान, बीए, एमए, बीएसस्सी, एमएसस्सी आणि बीकॉम, एमकॉम या पारपंरिक अर्थात अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची परीक्षा होणार नसल्याची घोषणा राज्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली. तर, आशिष शेलार यांनी राज्य सरकारचा निर्णय विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचे म्हणत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन निवेदन दिले. यामुळे एटीकेटी आणि बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनी कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नये. सरकार आपाल्या सोबत आहे, असे उदय सामंत यांनी म्हंटले होते.