उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
नवी दिल्ली: महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये शैक्षणिक देवाण-घेवाणे होणार असल्याची माहिती राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. येथील दिल्ली सचिवालयात सामंत यांनी आज दिल्लीचे उपमुख्यमंत्री तथा शिक्षण मंत्री मनिष सिसोदिया यांची भेट घेतली.
या भेटीनंतर पत्रकारांना दिलेल्या माहितीत सामंत म्हणाले, दिल्ली शासनाने शौक्षणिक अभ्यासक्रमात काही उत्कृष्ट उपक्रम राबविलेले आहेत. त्यांचा फायदा येथील विद्यार्थ्यांना होत आहे. याच पद्धतीचा सकारात्मक परिणाम राज्यातील विद्यार्थ्यांवरही व्हावा याबाबत चर्चा झाली. परदेशातील शैक्षणिक संस्थासोबत सामज्यंस करार केले जातात. त्याच धर्ती इतर राज्यातील उत्कृष्ट उपक्रमाबाबतही करार व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
अन्य राज्यातही शैक्षणिक काही चांगले उपक्रम राबविले असल्यास त्याचीही माहिती घेतली जाईल, असेही सामंत म्हणाले. पुढील काळात राज्यातील शिक्षणविभागाचा चमु दिल्ली शासनाला भेटून शैक्षणिक अभ्यासक्रमाबद्दलची संपूर्ण माहिती घेईल. यासह सिसोदिया हेही राज्यात येऊन राज्यातील शैक्षणिक पद्धती जाणुन घेतील, असे त्यांनी सांगितले.
सायबर, क्रीडा विद्यापीठ उभारणार वाढत जाणाऱ्या सायबर घटनांना आळा घालण्यासाठी राज्यात सायबर विद्यापीठ तसेच पुढील 10-15 वर्षात देशाचे नाव ऑलम्पिकमध्ये चमकावे यासाठी क्रीडा विद्यापीठ लवकरच उभारली जातील, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांनी दिली. सावंत म्हणाले, भविष्यात आतंकवाद्याकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ज्या वाईट घटनांना परिणाम देण्यात येणार आहे त्याचा सामना तरुणांनी करावा यासाठी महाराष्ट्र शासन लवकरच सायबर विद्यापीठ सुरू करणार आहे. यासोबतच राज्यात उत्कृष्ट खेळाडू तयार व्हावेत यासाठीही क्रीडा विद्यापीठ सुरू केले जाईल.