पुणे – फॅशन टेक्नॉलॉजी, बायो – टेक्नॉलॉजी आणि अर्किटेक्चरसह अभियांत्रिकीच्या एक तृतीयांश प्रवेशासाठी 12 वीला गणीत हा विषय यापुढे बंधनकारक असणार नाही, असे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने नुकतेच जाहीर केले आहे. परिषदेची 2022-23 साठीची मार्गदर्शक नियमावलीमध्ये कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी रसायनशास्त्र हा विषय पर्यायी करण्यात आला आहे.
29 डिप्लोमा/पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी गणीत हा विषय पर्यायी ठरवण्यात आला आहे. कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक, इन्फरमेशन टेक्नॉलॉजी, बायोलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, टेक्निकल व्होकेशनल विषय, ऍग्रीकल्चर, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, इन्फॉरर्मेटिक प्रॅक्टिस, बिझनेस स्टडीज आणि आंत्रप्रेनरशीप या 14 विषयांचा अभ्यास करणारे विद्यार्थी गणीताला पर्याय म्हणून अभियांत्रिकीसाठी पात्र ठरतील.
2021-22 च्या मार्गदर्शक नियमावलीत अभियांत्रिकीच्या सर्व अभ्यासक्रमांना गणीत आणि फिजिक्स हे विषय पर्यायी केल्याने टीकेची झोड उठली होती. त्यामुळे गणीत, रसायनशास्त्र आणि फिजिक्सची आवश्यकता नसणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी हा पर्याय ठरवण्यात आला आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शालेय शिक्षण पध्दती ही 5 + 3 + 3 + 3 अशी विभागली आहे. अखेरची चार वर्षे कला, शास्त्र आणि कॉमर्स या शाखांसाठी नाहीत त्या काळात ते गणित, फिजिक्स आणि सायकॉलॉजी किंवा केमिस्ट्री आणि कम्प्युटर इंजिनिअरींग शिकू शकतात. त्यामुळे 12 वीनंतर ते कोणत्याही नवा अभ्यासक्रम निवडू शकतील, अशी ही योजना होती. ही संधी किंवा कार्यक्रम पहिल्या दोन सत्रात योग्य बांधणीद्वारे देण्यात आली आहे, असे परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुध्दे यांनी प्राचार्यांच्या ऑनलाईन बैठकीत सांगितले.
शिक्षण तज्ज्ञ मात्र या निर्णयावर टीका करत आहेत. असे बहुपर्यायी अभ्यासक्रम निर्माण केल्याने मुलभूत ज्ञान समजण्यास विद्यार्थ्यांना मदत होणार नाही. त्यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण हिणकस दर्जाचे बनेल.त्यामुळे पायाभूत दर्जाचे गणीत, फिजिक्स आणि केमिस्ट्री हे विषय बी. ई किंवा बि. टेक साठी आवश्य असावेत. तंत्रशिक्षण परिषद मात्र बहूपर्यायी अभ्यासक्रम घेण्याचे सुचवते. त्यावेळी अप्रत्यक्षपणे हे विषय अभियांत्रिकीसाठी महत्वाचे असल्याचे मान्य करत असतात, असे बंगळुरू मधील अण्णा विद्यापीठाचे माजी कुलगुरु बालगुरूस्वामी यांनी सांगितले.