प्रतिभाताई पाटील आणि द्रौपदी मुर्मू या दोन्ही राष्ट्रपतींची निवड आश्चर्यकारक मानली गेली. या दोन्ही महिला राज्यपाल, आमदार आणि मंत्री राहिलेल्या आहेत. दोन्ही महिला या महिला सशक्तीकरणाच्या प्रतीक आहेत.
नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख कशा प्रकारे करायला हवा? कॉंग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी आक्षेपार्ह विधान करून नव्या वादाला तोंड फोडले होते. अर्थात त्यांनी या वादावर माफी मागितली आणि बोलताना जीभ घसरल्याचे ते सांगत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या आक्षेपार्ह शब्दाला तीव्र आक्षेप घेतला. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील (2007 ते 2012) यांनी पदभार सांभाळला तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा वेगळा उल्लेख केला होता. तेव्हा पाटील यांनी ही गोष्ट हसण्यावर नेली. शेवटी प्रतिभा पाटील यांना राष्ट्रपती असा उल्लेख केला गेला.
राष्ट्रपती की राष्ट्रपत्नी हा वाद जुना आहे. घटनात्मक परिषदेतील सदस्यांनी महिला राष्ट्रपतीला “राष्ट्रपत्नी’ म्हणायचे की नाही यावर विचार केला आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्पष्ट केले की पुरुष असो किंवा महिला असो राष्ट्रपतीला “राष्ट्रपती’ म्हणायला हवे. प्रतिभा पाटील या महाराष्ट्रातील प्रभावशाली मराठा कुटुंबातील आहेत. त्यांचा विवाह राजपूत कुटुंबातील व्यक्तीशी झाला. त्याचवेळी द्रौपदी मुर्मू यांचा संबंध ओडिशातील गरीब आणि आदिवासी कुटुंबाशी आहे. त्यांचे पालनपोषण मागास भागात झाले. तेथे वीज नव्हती आणि रस्ताही नव्हता. शाळेत त्या अनवाणी जात होत्या. त्यांच्याकडे एकच ड्रेस होता आणि तोच ड्रेस वर्षभर घालायच्या. यावरून त्यांची आर्थिक स्थिती लक्षात येते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना नोकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता. पण नशिबाने त्यांना राजभवन आणि नंतर राष्ट्रपती भवनापर्यंत पोचवले. दोन्ही राष्ट्रपतींची निवड ही आश्चर्यकारक होती. एक शिकलेल्या पण मागास भागातील असल्याने मुर्मू यांना अनेक लाभ मिळणार होते. या दोन्ही महिला राज्यपाल, आमदार आणि मंत्री राहिलेल्या आहेत. प्रतिभाताई वकील होत्या तर द्रौपदी या शिक्षक. दोन्ही महिला अध्यात्मिक विचारांच्या आहेत.
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचे नाव जाहीर झाल्यानंतर त्यांच्या साधेपणाचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले. एका व्हिडिओत त्या पूजा करण्यापूर्वी पूर्णदेश्वरी शिव मंदिराच्या परिसरात साफसफाई करत असल्याचे दिसतात. ते पाहून लोकांना आश्चर्य वाटले. प्रतिभा पाटील या महिला सशक्तीकरणावर विश्वास ठेवतात. त्यांनी विद्या भारती शिक्षक प्रसारक मंडळाची स्थापना केली आहे. या संस्थेचे अमरावती, जळगाव आणि मुंबईत शाळा व महाविद्यालय आहेत. पाटील यांनी श्रम साधना ट्रस्टची देखील स्थापना केली. हे ट्रस्ट दिल्ली, मुंबई, पुण्यात काम करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह चालवते. मुर्मू यांनी उरिया भाषेतील मासिकात विचार मांडले आहेत. त्या म्हणतात, की पुरुषाच्या प्रभाव असणाऱ्या राजकारणात महिलांसाठी आरक्षण असणे गरजेचे आहे. अशा स्थितीत राजकीय पक्ष उमेदवारांची निवड करणे किंवा निवडणूक लढण्यासाठी तिकीट वाटपाच्या माध्यमात बदल करू शकतात.
प्रतिभा पाटील यांच्या डोक्यावर तुम्ही कायम पदर पाहू शकता. ही एक परंपरा आहे; तर मुर्मू या साधी पारंपरिक पांढरी साडीचा पेहरावात दिसतात. राष्ट्रपतींनी आपल्या नातेवाईकांना नवी दिल्लीतून सुमारे डझनभर साड्या आणण्यास सांगितले आहे. दोन्ही महिलांत प्रचंड आत्मविश्वास आहे. कारण या पदापर्यंत पोचण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. दोन्ही महिला राष्ट्रीय पक्षाशी निगडीत आहेत. तीस वर्षांपर्यंत आमदार राहिलेल्या प्रतिभा पाटील यांनी पराभव कधीही पाहिलेला नाही. त्या विरोधी पक्षाच्या नेत्याही राहिल्या आहेत. राज्यसभेत उपसभापती (1986 ते 88) राहिल्या आहेत.
द्रौपदी मुर्मू या शाळा तसेच महाविद्यालयात “टूडु’ या टोपण नावाने ओळखल्या जात. श्याम चरण टूडु हे बॅंक अधिकारी होते. विवाहानंतर त्यांना मुर्मू नावाने अेळखले जाऊ लागले. त्यांच्या एका शालेय शिक्षिकेने त्यांचे नाव द्रौपदी ठेवले. 2000 मध्ये रायरंगपूर आणि 2009 मध्ये मयूरभंज येथे भाजपच्या आमदार म्हणून निवडून आल्या. ओडिशात भाजप-बीजेडी आघाडी सरकार असताना द्रौपदी मुर्मू यांनी वाणिज्य, परिवहन, मत्स्य आणि पशुसंवर्धन खात्याचा पदभार सांभाळला. द्रौपदी मुर्मू यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यांनी पती आणि दोन मुलांना गमावले. एका मुलाखतीत त्यांनी म्हटले की, एकवेळ मी असा विचार केला होता की, मी कोणत्याही क्षणी मरेन. तेव्हा त्यांनी योगसाधना सुरू केली. “संथाली’ ला प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
भारतात संथाली हा सर्वात मोठा आदिवासी समुदाय असून तो झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिशात आढळतो. प्रतिभा पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होतील, असा कोणीही विचार केला नव्हता. त्यामुळे देशात महिलांच्या आत्मसन्मानात सुधारणा झाली. आता नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समुदायात कायापालट घडवून आणण्याचा प्रयत्न करू इच्छित आहेत. दोन्ही महिला या महिला सशक्तीकरणाच्या प्रतीक आहेत. परंतु हे प्रतीक उच्च पदावर पोहोचण्यासाठी सर्वसामान्य जनतेचे स्वप्न साकार व्हावे.