काश्मीरबाबत नको असलेले कायदे रद्द
श्रीनगर, दि. 12 – 1953 नंतर काश्मीरला लागू करण्यात आलेल्या कायद्याची पुन्हा तपासणी करण्यात येऊन राज्याला नको असलेले कायदे रद्द करण्यात येतील व राज्याची अंतर्गत स्वायत्तता राखण्यात येईल, असे सार्वमत आघाडीचे अध्यक्ष मिर्झा यांनी सांगितले.
सीमाप्रश्नाचा निकाल कधी?
बेळगाव – कर्नाटक विधानसभेत सीमाप्रश्नाबाबत निवेदन करून विधानसभागृहाबाहेर येत असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आमदारावर कन्नड चळवळच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. यामुळे सीमाप्रश्नाचा त्वरित निकाल लावा असे पत्रक काढले आहे.
जीनिव्हा शांतता बोलणी सुरू करा
मॉस्को – छोट्या प्रमाणावरील उभयपक्षी बोलणी प. आशियामध्ये दीर्घकाळ शांतता स्थापन करू शकणार नाहीत. जीनिव्हा शांतता बोलणी पुन्हा सुरू करावीत असे ब्रेझनेव्ह म्हणाले. ब्रिटिश पंतप्रधान विल्सन यांना दिलेल्या खान्याच्या वेळी ते बोलत होते.
बेकायदा सावकारी विरुद्धचा लढा
पुणे – बेकायदेशीर सावकारी विरुद्ध समाजवादी युवजन सभेने सविस्तर चर्चा केली. लढा हा सहकारी बॅंकेच्या विरुद्ध नसून बॅंकेच्या प्रवेशद्वारापाशी बेकायदेशीर सावकारी करणाऱ्या विरुद्ध आहे. सध्या बेकायदेशीर सावकारी बोकाळली आहे. त्यामुळे सहकारी क्षेत्रातील बॅंकांचेच नुकसान होत आहे.