Dainik Prabhat
Friday, July 1, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

भाष्य : स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे!

by प्रभात वृत्तसेवा
August 15, 2019 | 6:10 am
A A
भाष्य : स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे!

-विठ्ठल वळसे पाटील

स्वातंत्र्य आपसूक मिळाले नाही, ते त्याग, बलिदान देऊन मिळवले आहे. याचा विसर पडून अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराने वागणे, बोलणे, लिहिणे यांचा प्रवास अखंडपणे चालू आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रास्ताविकेतच मानवी मूल्ये मांडली आहेत. याचा विसर आजच्या पिढीला पडला आहे.

150 वर्षांची जुलमी सत्ता संपून ब्रिटिशांनी जाता जाता अखंड हिंदुस्थानचे दोन तुकडे करून ठेवले, एक भारत व दुसरा पाकिस्तान. वंदेमातरम, भारतमाता की जय, इन्कलाब जिंदाबाद अशा स्वातंत्र्य चळवळीतल्या घोषणांनी सारा आसमंत जागा होत होता. पारतंत्र्यात अनेकांनी बलिदान दिले, हे बलिदान, त्याग विसरून जायचे का? स्वातंत्र्याची सत्तरी ओलांडली तरी आजही प्लॅस्टिकचे झेंडे वापरू नका तसेच रस्त्यावर, कचराकुंडीत झेंडे टाकू नका हे सांगण्याची वेळ यावी, अपेक्षा दुसरी शोकांतिका असू शकत नाही. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, महाराष्ट्र दिन, क्रांतिदिनानिमित्त सरकारी व खासगी आस्थापनातील लोकांना ध्वजवंदना देण्यासाठी उपस्थित राहण्यास सांगावे लागते. राष्ट्रीय सणाला सुट्टी जोडून यावी अशी इच्छा असते. असे घडले तर मौज मजा करण्यासाठी अनेकजण फिरायला जातात तर अनेक जणांचे त्या दिवसापुरते राष्ट्रप्रेम जागे होते. शर्ट, गाडी आदी ठिकाणी तिरंगा लावला जातो.

73 वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असून स्वातंत्र्याच्या सत्तरीच्या काळात पाकिस्तानबरोबर मोठी चार युद्धे झाली. फाळणीमुळे भारत व पाकिस्तान यांच्यात कायमचे वितुष्ट निर्माण झाले. यात काश्‍मीरचा मुद्दा नेहमी केंद्रस्थानी राहिला. या चार युद्धात आठ हजार सैनिक व अधिकारी शहीद झाले, तर हजारो कायमचे जखमी झाले. संपूर्ण काश्‍मीर ताब्यात घेण्याच्या हेतूने 1947 व 1948 या सालांत पहिले युद्ध झाले, हे काश्‍मीर युद्ध म्हणून ओळखले जाते. या युद्धातून नियंत्रण रेषेचा जन्म झाला. ऑगस्ट 1965 साली दुसरे युद्ध झाले. यात पाकिस्तानने 50 हजार जिहादी उतरवले होते. 1971 साली पाकबरोबर झालेल्या युद्धात चारही आघाड्यांवर युद्ध झाले. यातून बांगलादेशाचा जन्म झाला. 97 हजार 368 पाक सैन्य ताब्यात घेतले. शेवटी पाक सैन्याने शरणागती पत्करली. चौथे युद्ध हे कारगिलचे युद्ध होय. हे 1999 साली झाले. याचे वेगळेपण म्हणजे हे युद्ध 15 ते 19 हजार फूट उंचीवर लढले गेले. यात भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी मोठी शर्थ गाजवली. याशिवाय अनेक ऑपरेशन झाली. शिवाय छोट्या चकमकी चालू आहेतच. चीनबरोबर 1962 साली अनिश्‍चित सीमारेषेवरून झालेल्या युद्धात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. पाकप्रमाणे चीनबरोबर चकमकी होत आहेत. शौर्याची परंपरा राखण्याचे काम सीमेवरील जवान करत आहे.

13 डिसेंबर 2001 साली संसद भवनावर झालेला हल्ला, 2003 साली मुंबईतील कार बॉम्बस्फोट, जुलै 2006 मधील 7 बॉम्बस्फोटात 200 जणांनी जीव गमावला, 2008 साली, जुलै 2011 साली पुन्हा मुंबईत हल्ला, असे अनेक छुपे हल्ले आहेत की, त्यात भारतीय सैन्यासह पोलीस विभागाने आपली शर्थ दाखवली आहे. पण यात त्या त्या वेळच्या सरकारला कोंडीत पकडण्याचे काम विरोधकांबरोबर बुद्धिमान मंडळींनी केले आहे. प्रसारमाध्यमेसुद्धा अपप्रचाराची प्रसिद्धी करत असतात. त्यातून असुरी आनंद लुटला जातो. सुरक्षा व्यवस्था छेदून जाणारे दहशतवादी, अंतर्गत भागात नक्षली कारवाया, त्यांना पाठबळ देणारे खुलेआम फिरत आहेत.

भारताबरोबर स्वातंत्र्य मिळवलेल्या अनेक देशांनी गरूडभरारी घेत प्रगती साधली. स्वातंत्र्यानंतर देशात एक विकासाची लय तयार व्हायला पाहिजे होती मात्र, सत्तेबरोबर मूळचा भांडवलशाही वर्ग व नोकरशहा यांनी भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. यात 80 च्या दशकापासून आतापर्यंत 36 मोठे घोटाळे झाले. बोफोर्स, शेअर घोटाळा, मुद्रांक घोटाळा, चारा घोटाळा, 2 जी स्पेक्‍ट्रम घोटाळा, सिंचन घोटाळा, मध्य प्रदेशातील व्यापम घोटाळा, राष्ट्रकुल स्पर्धां, आदर्श हाऊसिंग, ओडिशा व झारखंड खाण घोटाळा, खाद्यान्न घोटाळा, नीरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या यांचे घोटाळे अशा अनेक घोटाळ्यांतून गेलेला पैसा विकासकामांना लावला असता तर देशाची प्रगती नक्‍कीच झाली असती. आज चिंता आहे ती भविष्यातील उद्याची. आम्हाला, आमच्या पिढीला भ्रष्टाचारमुक्‍त देश मिळेल का? वाढता स्वैराचार युवा शक्‍तीला काय आदर्श देणार? पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा उभा राहत आहे. ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी अनेक पिढ्यांची सोय करून ठेवली; पण मागे राहिलेला वर्ग आजही अंधारातून वाट शोधत आहे.

महामानवांच्या पुतळ्यांच्या विटंबना देशाच्या विचाराला कलंक आहे. राष्ट्रपुरुषांच्या जातीनिहाय वाटण्या झाल्या आहेत. अवमानकारक वक्‍तव्य व चर्चा यांना उधाण आले आहे. आता आम्हीच आमच्या देशात राष्ट्रपुरुषांची बदनामी, अवमान करण्याचे धाडस करत आहोत. आजच्या पिढीने स्वातंत्र्याचा संघर्षाचा लवलेश अनुभवलेला नाही. ज्या राष्ट्रपुरुषांना जगात मोठा सन्मान केला जातो त्यांचा अवमान करताना थोडासासुद्धा विचार केला जात नाही. अशा वागण्याला भावी पिढी दोष दिल्याशिवाय राहणार नाही.

देशात पाणी प्रश्‍न, रोजगार, दुष्काळ, वनीकरण अशा अनेक गोष्टींवर काम करण्याची गरज आहे. असे निःस्वार्थी काम करणाऱ्यांच्या जीवावर हा देश तरला आहे. नव्या पिढी पुढे उज्ज्वल भविष्यासाठीच्या मूल्यांची जागा जर स्वैराचाराने घेतली तर भारत युगाचे स्वप्न अधुरे राहील यात तीळमात्र शंका नाही!

Tags: #IndependenceDayeditorial page article

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?
अग्रलेख

अग्रलेख : चौदा पक्ष एनडीएला पर्याय ठरतील?

4 days ago
कटाक्ष : फुले का पडती शेजारी?
संपादकीय

कटाक्ष : फुले का पडती शेजारी?

4 days ago
नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर
संपादकीय

नोंद : आर्थिक समावेशीकरणाच्या मार्गावर

4 days ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : मिझो “ब्रिगेडियर’ शरण आला
संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : पाक सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा इशारा

4 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“भाजपचाच डबल इंजिन सरकारवर विश्‍वास नाही”

#RussiaUkraineWar : युक्रेन मधील स्नेक आयलंड मधून रशियाची माघार

उद्धव ठाकरे ‘ऍक्शन’मोडमध्ये; शिवसेना भवनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपला विचारला जाब…

#SLvIND 1ST WODI : दीप्तीची अष्टपैलू कामगिरी; भारताचा श्रीलंकेवर विजय

शिंदे-फडणवीसांचे दोन चाकी स्कुटर सरकार; हँडल मात्र मागे बसलेल्या व्यक्तीच्या हातात, राष्ट्रवादीची टीका

“वाटलं होतं की तुम्ही मुख्यमंत्री म्हणूनच परताल, परंतु…” राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र

Stockholm Diamond League : नीरजचा धमाका सुरूच, फक्त 16 दिवसात दुसऱ्यांदा मोडला स्वत:चा विक्रम

शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, जयंत पाटील म्हणतात;”जाणीवपूर्वक काही लोकांचा…”

Major milestone : DRDO चा मानवरहित (UAV) विमान उड्डाणाचा प्रयोग यशस्वी; वाचा सविस्तर

न्यायालयात पुरावा म्हणून आणलेला बॉम्ब फुटला, स्फोटात एक पोलीस जखमी

Most Popular Today

Tags: #IndependenceDayeditorial page article

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!