Dainik Prabhat
Saturday, May 28, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय अग्रलेख

प्रचाराची पातळी का घसरतेय? (अग्रलेख)

by प्रभात वृत्तसेवा
April 20, 2019 | 5:54 am
A A

भारताला स्वातंत्र्य मिळून आता जवळजवळ पाऊण शतकाचा काळ होत आला आहे. स्वातंत्र्यानंतर आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली आणि आता आपल्या देशात खऱ्या अर्थाने लोकशाही रूजली आहे असा दावा आपण करतो. पण प्रत्यक्षात तसे नाही. लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. पण आपल्याकडे अजूनही लोकांच्या मतांचा, भावनांचा विचार होतो असे दिसत नाही. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सुरुवातीच्या काळात समाजातील विशिष्ट गटापुरतेच राजकारण मर्यादित होते.

सर्वसामान्य लोक तर राजकारणात पडण्याचा विचारही करू शकत नव्हते. स्वातंत्र्यानंतर जे लोक राजकारणात आले ते पूर्वीचे सत्ताधारी म्हणजे सरंजामदार वर्गातील होते. नेते बोले आणि प्रजा हाले अशी स्थिती होती. पण नंतरच्या काळात राजकारणात जसा बुद्धीवादी आणि सर्वसामान्यांशी नाळ जुळणाऱ्या नेत्यांचा शिरकाव झाला तसा राजकारणातील प्रस्थापित वर्ग अस्वस्थ झाला. विशेषत: गेल्या पाच वर्षांत भारतीय राजकारणात होत असलेला बदल अधिकाधिक गडद होत चालला आहे आणि त्यामुळे ही अस्वस्थताही वाढू लागली आहे. प्रचाराच्या घसरलेल्या पातळीमागे हे महत्त्वाचे कारण आहे.

अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत चौकीदार चोर है ही घोषणा दिली जाते. पण मोदी यांनी चौकीदार चोर है या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी मैं भी चौकीदार ही नवी घोषणा आणली आणि त्याला प्रतिसाद मिळाला. अर्थात केवळ नरेंद्र मोदींवरच अश्लाघ्य टीका झाली किंवा होते आहे असे नाही तर कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवरही अशीच बोचरी टीका होत असते. पक्षाला अडचणीत आणणारी त्यांची धोरणे यावरून त्यांच्यावर सातत्याने टीका होते. त्यांना पप्पू म्हणून हिणवले जाते हे चुकीचे आहे. 2019च्या निवडणूक प्रचारातील हीन पातळी गाठणारा प्रचार म्हणजे जातीयवादी प्रचार.

मायावती, नवज्योतसिंग सिद्धू, कॉंग्रेसचे विविध नेते, समाजवादी पक्ष या सगळ्यांनी उघडपणे मुस्लिमांनी आम्हालाच मतदान करावे असे आवाहन केले. मग भाजपनेही त्यांचा अली तर आमचा बजरंगबली असा प्रचार केला. अशा प्रचाराची दखल घेऊन निवडणूक आयोगाने मायावती, आझमखान, योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात कारवाई केली. काहींना 48 तास तर काहींना 72 तास प्रचार करण्यास बंदी घातली. निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच अशी कारवाई केली, तीही सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावर. मात्र निवडणूक आयोगाचा दरारा निवडणूक लढवणाऱ्या पक्षांवर आणि त्यांच्या नेत्यांवर किती आवश्‍यक आहे हे यातून दिसून आले आहे.

आपल्या देशातील अनेक घटनात्मक संस्थांचे खच्चीकरण झाले होते. निवडणूक आयोगही त्याला अपवाद नव्हता. पण टी. एन. शेषन यांनी या संस्थेला संजीवनी दिली आणि आता हळूहळू निवडणूक आयोगही कात टाकू लागला आहे. राजकीय नेत्यांच्या अनिर्बंध वागण्याचा आणि बोलण्याचा सर्वाधिक फटका राजकारणातील महिलांना बसला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी भाजपच्या नेत्या जयाप्रदा यांच्यावर अत्यंत अश्‍लिल टीका केली. त्यावरून संपूर्ण देशात गदारोळ झाला. आझम खान यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने कडक कारवाई करावी अशी मागणीही झाली. आयोगाने त्यांना नोटीसही पाठवली. पण आझम खान यांची गुर्मी उतरली नाही. आझम खान मुसलमान असल्यानेच आयोगाने त्यांना नोटीस पाठवली असा आरोप त्यांच्या मुलाने केला तेव्हा तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटली.

म्हणजे मायावती, योगी आदित्यनाथ यांच्यावर झालेली कारवाई त्यांच्या गावीच नव्हती. राजकारणात असलेल्या महिलांवर सातत्याने टीका टिप्पणी होत असते. कॉंग्रेसच्या महासचिव झालेल्या प्रियांका गांधी वढेरा यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर त्यांच्या दिसण्यावरून खूप शेरेबाजी झाली. त्यांचे नाक त्यांच्या आजीसारखे आहे म्हणून त्यांना सत्ता मिळणार नाही असे भाजपच्या गुजरातमधील एका नेत्याने म्हटले होते. बिहारचे एक मंत्री विनोद नारायण झा यांनी म्हटले होते की प्रियांका गांधी सुंदर आहेत. सुंदर असण्याशिवाय दुसरी कोणतीही गुणवत्ता मला त्यांच्यात दिसत नाहीत. केवळ सुंदर असणे एवढेच मते मिळवण्यासाठी पुरेसे नसते. भाजपच्या आणखी एक नेत्या स्मृती इराणी यांच्यावरही अनेकदा शेरेबाजी झाली आहे. त्यांच्या डिग्रीपासून त्यांच्या दिसण्यापर्यंत सगळ्यावर शेरेबाजी करण्यात आली. त्यांच्या कुंकवाच्या आकारावरूनही एका नेत्याने त्यांची खिल्ली उडवली होती.

हेमा मालिनी, मायावती यांनाही अशा पुरुषी वर्चस्वाच्या खुणा दाखवून देणाऱ्या बोचऱ्या टीकेला तोंड द्यावे लागले आहे. जगातही अशी उदाहरणे आढळतात. पण भारतीय समाज पुरूषप्रधान आणि परंपरावादी आहे. महिलांचे स्वकर्तृत्वावर पुढे येणे, समाजात स्थान निर्माण करणे कदाचित आपल्या समाजालाच खपत नसावे. नाहीतर अगदी इंदिरा गांधींवरही गुंगी गुडिया म्हणून टीका झालीच नसती. या नेत्यांना कायद्याचा बडगा बसेल की नाही माहीत नाही. तो बसणारच नाही बहुधा. पण सुजाण आणि सुशिक्षित नागरिकांनी मात्र अशा नेत्यांना जाब विचारले पाहिजे. आपल्या प्रतिस्पर्ध्याचा, महिला असो वा पुरूष आदर करायलाच पाहिजे आता आपल्या राजकीय वर्गाला शिकवण्याची वेळ आली आहे. लोकशाहीत वेगवेगळ्या मतांचे राजकीय पक्ष असतात.

सगळ्यांना एकाच देशासाठी काम करायचे असते. निवडणुकीपुरते ते एकमेकांविरोधात असतात. पण निवडणुका झाल्यावरही विरोधी पक्षाने सत्ताधाऱ्यांबरोबर ताळमेळ साधायचा असतो, देशहिताच्या दृष्टीने मुद्द्यावर तरी असा ताळमेळ असायलाच पाहिजे. पण आपल्या देशातील सगळेच राजकीय पक्ष आपापल्या विरोधकांना प्रतिस्पर्धी नाही तर शत्रू मानतात आणि काही राजकीय पक्षाच्या नेत्यांना तर सत्ताधीश असणे हा आपला परंपरागत अधिकार वाटतो.

लोकशाही खऱ्या अर्थाने लोकांमध्ये रुजायची असेल तर राजकारणातील ही सामंतशाही नष्ट व्हायला हवी आणि जेव्हा सर्वसामान्य लोक आपल्या लोकशाहीविषयी आदर बाळगायला शिकतील तेव्हाच सामंतशाहीचे प्रतिनिधीत्व करणारे राजकीय पक्ष आणि नेते दूर होतील.

Tags: #LokSabhaElections2019editorial page articleसत्तेबाजी

शिफारस केलेल्या बातम्या

अग्रलेख : अलगतावादी राजकारणाचा अंत?
अग्रलेख

अग्रलेख : अलगतावादी राजकारणाचा अंत?

1 hour ago
राजकारण : नितीशकुमारांची गूगली
संपादकीय

राजकारण : नितीशकुमारांची गूगली

1 hour ago
विदेशरंग : बुडत्याचा पाय खोलात
संपादकीय

विदेशरंग : बुडत्याचा पाय खोलात

1 hour ago
47 वर्षांपूर्वी प्रभात : गरीब शेतकरी नष्ट झाला तर देशाचा आत्मघात
संपादकीय

47 वर्षांपूर्वी प्रभात : वाचक व संपादक संवाद प्रस्थापित होणे जरुरी

1 hour ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अनिल देशमुख यांचा रक्तदाब वाढला, छातीत त्रास; KEM हॉस्पिटलच्या ICUमध्ये दाखल

Stock Market: सलग दुसऱ्या दिवशी निर्देशांकांत वाढ; जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्याचा परीणाम

इलेक्‍ट्रिक दुचाकींना आग का लागते, तज्ञ समितीकडून चौकशी पूर्ण; लवकरच कारण येणार समोर

2000 रुपयांच्या नोटांची संख्या वेगाने होतेय कमी, छपाई झाली बंद

आयपीएल स्पर्धेत पाक खेळाडूंनाही संधी द्या – अख्तर

क्रिकेट काॅर्नर : द्विशतकी धावांचाही झाला विनोद

अँबेसिडर पुनरागमन करणार; इलेक्‍ट्रिक कार म्हणून बाजारात येण्याची शक्‍यता

सिमेंटचे दर वाढणार; कच्चा माल आणि वाहतुकीचा खर्च वाढल्याचा परिणाम

ड्रोनचा वापर वाढणार

नवनीत राणांच्या तक्रारीची संसदीय समितीकडून गंभीर दखल; महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्लीत हजर राहण्याचा आदेश

Most Popular Today

Tags: #LokSabhaElections2019editorial page articleसत्तेबाजी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!