भारत-चीन मैत्री अधिक मजबूत होईल
नवी दिल्ली, दि. 20 – परस्परांतील संबंध सुरळीत होत असल्याने भारत व चीन आपली मैत्री अधिक मजबूत करू शकतील, अशी आशा राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आज व्यक्त केली.
राजदूत पातळीवर संबंध पुन्हा प्रस्थापित झाल्याने परस्परातील संबंध आणखी सुधारतील असा आपणास विश्वास वाटतो, असे मत चीनचे भारतातील नवे राजदूत चेन चाओ-युआन यांनी व्यक्त केले. चिनी व भारतीय जनतेतील मैत्री व भारत-चीन संबंध अधिक विकसित करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करील, असेही चेन म्हणाले.
कुवेतमधील नवे नगर भारतीय तज्ज्ञ उभारणार
कुवेत – कुवेत राज्याची राजधानी जी कुवेत येथून 10 किमी अंतरावर तमाम नागरी सुखसोयींनी युक्त असे नवीन नगर वसविण्याचे ठरले असून ते काम आंतरराष्ट्रीय स्पर्धेतून शेवटी भारत सरकारच्या “दि इंजिनिअरिंग प्रोजेक्टस इंडिया लि.’ या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला मिळाले आहे. या स्पर्धेत इटाली व कोरिया ही राज्ये उतरली होती.
पीक विमा योजना विचाराधीन
नवी दिल्ली – पीक विमा योजना अंमलात आणण्याचा मसुदा केंद्रीय शेती खात्याच्या विचाराधीन आहे, असे केंद्रीय शेती व पाटबंधारे मंत्री जगजीवनराम म्हणाले.