मुंबई – पंजाब विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना अंमलबाजावणी संचनालयाने (ईडी) लुधियाना, मोहाली आणि पठाणकोटमध्ये 10 ठिकाणी छापे टाकले. त्यात पंजाबमध्ये मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांचा भाचा आणि त्यांचे निकटवर्तीय यांच्या घरी ईडीकडून छापे टाकण्यात आले. या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाष्य केले आहे.
पंजाबमधील या छापेमारीची वेळ पाहता हे स्पष्ट होतं की, ही धाडसत्र राजकीयदृष्ट्या प्रेरित आहे. जिथे जिथे निवडणुका असतात तिथे ईडी आणि आयकर विभाग सक्रीय होतो. बंगाल, उत्तरप्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र सगळीकडे हेच घडलं, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
पुढे मलिकांनी म्हटले आहे की, भाजपकडून सरकारी यंत्रणांचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर केला जात आहे. या घटनेवर सर्वोच्च न्यायालयानेही भाष्य केलेले आहे. पंजाबमधील घटनेनंतर यावर शिक्कामोर्तब झाले, असे नवाब मलिक म्हणाले.