नशिक : ‘दिल्लीत अनेक डोमकावळ्यांची फडफड सुरू असते, पण सरकार पाडण्याची सुपारी ते फोडू शकत नाहीत. NCB, ED हे सगळं वापरून झालं असेल तर आमचं सरकार पाडण्यासाठी सैन्य बोलवा’, अस आव्हान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.
राऊत नाशिक येथे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. राऊत म्हणाले की, दिल्लीत मी राहातो, तिथे चांगल्या प्रकारचे मोर आहेत. काही वेळा मी तिथे माझ्या आजूबाजूला डोमकावळ्यांची फडफड बघतो. पण ते कितीही फडफडले तरी त्यांना आमचं सरकार पाडण्याची सुपारी काही फोडता येणार नाही.
दरम्यान महाराष्ट्र हे तुळशी वृंदावन आहे, इथे तुळशीचे पीक जास्त आहे. पण काही लोकांना वाटते की या राज्यात काही गांजा, भांग आपण पिकवू. पण ते शक्य नाही, असा हल्लाबोलही राऊत यांनी भाजपवर चढवला.तसेच तुम्ही माझ्यावर कितीही आरोप करा, माझ्या पाठिचा कणा ताठ आहे आणि मन फार खंबीर आहे. मी शिवसेनेसाठी कोणतेही आणि कसेही घाव झेलायला तयार असल्याचंही राऊत यांनी नमूद केलं.