पुणे – नोटाबंदी आणि चुकीच्या पद्धतीने राबविण्यात आलेली जीएसटी प्रणालीमुळे देशाची अर्थव्यवस्था भाजप सरकारने पंक्चर केली आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी येथे केली.
मोदी सरकारच्या काळात जीडीपी 5 टक्क्यांवर घसरला आहे. तर, बांगलादेश, भूतान, नेपाळचा जीडीपी 7.5 च्या पुढे आहे. बॅंक घोटाळे 71 हजार कोटींच्या घरात पोहचले आहेत. देशात सहा लाख, तर महाराष्ट्रात 1.5 लाख कंपन्या बंद पडल्या, असाही दावा गाडगीळ यांनी केला. “एकही आरोप न झालेले महाराष्ट्रातील पहिले सरकार’ हे मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान खोटे आहे. गेल्या पाच वर्षांत मुंडे, तावडे, मेहता यांच्यावर आरोप झाले. त्याची मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी, म्हणूनच त्यांनी असे विधान केले असावे असा टोलाही गाडगीळ यांनी लगावला.