भाजपकडून डॉ.मनमोहन सिंह यांच्या आरोपांना प्रत्युत्तर
नवी दिल्ली : देशात सध्या अर्थव्यवस्थेच्या परिस्थितीवर सरकारवर चारही बाजूनी टीका होताना दिसत आहे. सरकारच्या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था डबघाईस आल्याचा विरोधकांनी आरोप केला. त्यातच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीदेखील अर्थव्यवस्थेवरुन केंद्र सरकारवर टीका केली. याच टीकेला भाजपाने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणाने भारताला जागतिक अर्थव्यवस्थेत बळकटी दिली असून आघाडीच्या देशांत स्थान मिळवून दिले असल्याचेही भाजपाने म्हटले आहे.
भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत भारतीय अव्यवस्था सुस्थितीत असल्याचा दावा केला. जीएसटी आणि करप्रणालीत बदल करत मोदी सरकारने गेल्या सहा वर्षात अर्थव्यवस्थेत बदल केल्यानेच हे शक्य झाले, असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच मनमोहन सिंग यांच्या नृेत्त्वात भारताने प्रगती केली नसती कारण काही जणांनी भ्रष्टाचार, कुटुंबवादासाठी त्यांचा फक्त बाहुला म्हणून वापर केला असा टोलादेखील त्यांनी यावेळी लगावला. आपले कायदे अंमलात आणण्यासाठी तसेच भ्रष्टाचार, कुटुंबादाला प्रोत्साहन देण्याचा त्यांचा वापर करण्यात आला, असे संबित पात्रा यांनी म्हटले.