मुंबई: देशावर घोंघावत असलेलं आर्थिक मंदीचं संकट हे भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांची निष्पत्ती असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्यांनी हि टीका केली आहे. देशाची अर्थव्यवस्था अधिकाधिक घसरत चालली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या विकासदरात सर्वात मोठी घसरण झाली असून जीडीपी ४.५ टक्क्यांवर घसरला आहे.
राष्ट्रवादीने म्हटले आहे, सर्वात धक्कादायक म्हणजे भारताचे शेजारी देश, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका यांच्यापेक्षाही भारताचा विकासदर वाईट आहे. या राष्ट्रांच्याही खालोखाल भारताचा जीडीपी आकडा घसरला आहे. आकडेवारीनुसार बांग्लादेश ८.५%, श्रीलंका ६.५ %, पाकिस्तान ५.२ % तर भारत ४.५ % अशी जीडीपीची क्रमवारी आहे.
देशावर घोंघावत असलेलं आर्थिक मंदीचं संकट हे @BJP4India सरकारच्या चुकीच्या धोरणांची निष्पत्ती असल्याचे स्पष्ट झालेय. देशाची अर्थव्यवस्था अधिकाधिक घसरत चालली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशाच्या विकासदरात सर्वात मोठी घसरण झाली असून जीडीपी ४.५ टक्क्यांवर घसरला आहे. pic.twitter.com/Ml9ZyuaMXA
— NCP (@NCPspeaks) December 2, 2019