नगर – नगर-पुणे महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलावर दहा-बारा दिवसापूर्वीच बस व ट्रकचा समोरासमोर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर 13 ते 14 जण गंभीर जखमी झाले होते. या अपघातात पुलाचे कठाडे तुटले असल्याने, संबंधित विभाने तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी कठडे उभे केले आहे.
ते ही धोकादायक असून संबंधित विभागाने ते तत्काळ दुरुस्त करावे अशी मागणी नगरसेवक मनोज कोतकर यांनी खा. डॉ. सुजय विखे यांच्या कडे केली आहे. धोकादायक कठाड्याबाबत दैनिक प्रभातने वृत्त प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेवून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन विखे यांनी दिले.
महानगरपालिकेत प्रलंबित प्रश्नाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर यांनी केडगाव रेल्वे उड्डाणपुलावर नुकताच ट्रक-बसच्या अपघातात दोन प्रवासांचा मृत्यू झाला होता. तर अनेक प्रवाशी जखमी झाले होते. याघटनेला उलटून दहा ते बारा दिवस झाले असून संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा अपघात होण्याची शक्यता असून कठडे धोकादायक झाली आहेत. खा. विखे म्हणाले की, याबाबत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या चर्चा करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेचून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.