सध्याच्या धावपळीच्या जीवनात संतुलित आणि फिट राहणं जवळजवळ कठीणच झालं आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे आजारपण आणि आरोग्य समस्या आपला पाठलाग करू लागल्या आहेत. त्यात पुरेशी झोप आणि संतुलित आहार अलिकडे कोणीही घेताना दिसत नाही. प्रत्येकालाच निरोगी आयुष्य हव आहे. परंतु, ते आयुष्य हे सहज मिळत नाही.
ते कमवावं लागतं. अयोग्य आहार, रात्रीच्या जागरणामुळे न मिळणारी पुरेशी झोप आरोग्याच्या समस्यांसाठी कारणीभूत आहेत. त्यामुळे जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ शरीर हवे असेल, तर त्यासाठी स्वतःला थोडासा वेळ द्यावाच लागेल. नियमित व्यायाम करावाच लागेल आणि आहारातही योग्य बदल करण्याची गरज आहे.
1. जेवणाची सुरुवात सॅलडने करा. जेवण सुरु करताना भरपूर सॅलड खा.
2. सूर्यफूलच्या बिया, भोपळ्याच्या बिया, जवस, सुका मेवा अशा प्रकारच्या सुपरफूडचा समावेश करा.
3. जंक फूड कमी प्रमाणात खा. आहारात जंक फूड आणि तळलेले पदार्थ कमी प्रमाणात खा.
4. मद्यपान आणि धूम्रपान टाळण्याचा प्रयत्न करा.
5. गुड फॅट्सचा समावेश करा. आहारात गुड फॅट्सच असणं फार गरजचं आहे. कारण गुड फॅट्स आपल्या शरीराच्या पोषणासाठी अत्यंत महत्वाचे असतात. यासाठी आहारात बदामाचे तेल, सूर्यफुलाचे तेल, ऑलिव्ह ऑइल, जवसाचे तेल या पदार्थंचा समावेश करा. अतिप्रमाणात घेणंही वाईटच.
6. दररोज व्यायाम करा. तुम्ही रोज व्यायाम करत नसाल, तर सुरुवात 10 मिनिट वॉक करा. आणि हळूहळू वाढवत जा. लिफ्टचा वापर न करता जिन्याचा वापर करा.
7. साखर आणि मीठचा कमी वापर करा. साखर आणि मीठाने तुमचे वजन वाढते. प्रमाणात घेतलं तर तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल आणि फ्रेश वाटू लागेल.
8. तणावापासून दूर रहा. निरोगी जीवनशैलीसाठी ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा अन् पुरेशी झोप घ्या.
डॉ आदिती पानसंबळ,आहारतज्ज्ञ, नगर. संपर्क : 7385728886.