मुंबई- महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विकासाची वाट सोपी करण्याच्या आणि परवान्यांची संख्या कमी करण्याच्या धोरणाला प्रतिसाद देत ओयो हॉटेल्स अँड होम्सने राज्यातील पर्यटन व्य्ववसायाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या ओयो संवादावेळी पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकर सहभागी होते.
ओयो हॉटेल्स अँड होम्सचे संस्थापक रितेश अगरवाल आणि ओयो भारत आणि दक्षिण आशिया विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांनी योजनांची माहिती दिली. आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात पर्यटनाच्या आणि हॉटेल व्य्ववसायाच्या अमर्याद संधी आहेत आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होतात. महाराष्ट्राचे निसर्गसौंदर्य अभिमानास्पद आहे आणि किनारी पर्यटन, तीर्थयात्रा, आणि कृषि पर्यटन यामध्ये असलेल्या संधींना प्रोत्साहन देत आहोत. यासाठी सुलभ धोरण विकसीत करण्यात येत आहे.
रितेश अगरवाल म्हणाले की, महाराष्ट्र ही पर्यटन व्यवसायाची मोठी बाजारपेठ आहे. आम्ही राज्यात 5000 पेक्षा जास्त रोजगार निर्माण केले आहेत आणि येथील व्यापक पर्यटन संधींचा लाभ घेण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.