मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांची मागणी
भुवनेश्वर – पुर्व भारताला केंद्र सरकारच्या विशेष आर्थिक मदतीच्या पॅकजची गरज आहे असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी म्हटले आहे. हा भाग खनिज संपत्तीने परिपुर्ण असला तरी अजून या भागाचा विकास दुर्लक्षित राहिला आहे असे त्यांनी म्हटले आहे.
इस्टर्न झोनल कौन्सिलच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पटनाईक म्हणाले की देशाच्या पुर्वभागात रेल्वे, बॅंकिंग इत्यादी मुलभूत सेवेचाच अभाव आहे. त्यामुळे येथील पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी या भागाला केंद्र सरकारने विशेष आर्थिक पॅकेज देण्याची गरज आहे.
विविध राज्यांतील समस्यांवर उपाय शोधण्यासाठीच अशा विभागीाय परिषदा होत असतात. त्यावेळी त्या त्या भागाची गरज लक्षात घेऊन त्याची पुर्तता केंद्र सरकारने केली पाहिजे अशी मागणी पटनाईक यांनी केली.