मुंबई – राज्य सरकारनं अनलॉक-4 च्या नियमावली जाहीर केल्या आहेत. केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारनं राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे.मार्च महिन्यापासून राज्यात सुरु असलेली जिल्हा बंदी अखेर उठली आहे. राज्यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवासासाठी लागणारा ई पास अखेर राज्य सरकारने रद्द केला आहे.
राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार, हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. मात्र मेट्रो, सिनेमा गृह बंदच राहणार आहेत. त्याचबरोबर शाळा आणि काॅलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. मुंबई आणि MMR मध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात 50 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील. येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट केली आहे.
Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown. (1/3)#MissionBeginAgain pic.twitter.com/2tgFa8poco
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 31, 2020
अनलॉकचा चौथा टप्पा 1 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती दिल्या आहेत, त्याची नियमावली आज जाहीर झाली आहे.
काय सुरू होणार आणि काय बंद राहणार…
- कंटेनमेंट झोनमध्ये 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन
- हॉटेल आणि लॉज 100 टक्के सुरु होणार.
- जिल्हा अंतर्गत प्रवासासाठी आता ई-पास गरज नाही.
- प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा
- खासगी बस आणि मिनी बसला प्रवासासाठी मुभा.
- शाळा-कॉलेज 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार.
- मंदिरं आणि जिमबद्दल अद्याप घोषणा नाही
- 30 सप्टेंबरपर्यंत मेट्रो धावणार नाही
- सिनेमागृह 30 सप्टेंबरपर्यंत राहणार बंदच
- स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, थेटर्स आणि बिअर बारवरील बंदी कायम
- 50 पेक्षा जास्त लोकांना सार्वजनिक कार्यक्रमात एकत्र येता येणार नाही.
- अंत्यविधी यासाठीदेखील 20 पेक्षा जास्त लोक एकत्रित येऊ शकणार नाही.