इटानगर – अरूणाचलप्रदेशला आज भूकंपाच्या मध्यम तीव्रतेचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता 5.5 इतकी नोंदवली गेली. हा भूकंप आसामलाही जाणवला. पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला.
भूकंपाचा केंद्र बिंदु पुर्व कामेंग जिल्ह्यात जमीनीखाली 10 किमी अंतरावर होता. तथापी या भूकंपामुळे कोठेही मोठे नुकसान झाल्याची नोंद नाही. काहीं सेंकद हा भूकंप जाणवल्याने नागरीकांमध्ये मात्र मोठीच घबराट उडाली. या राज्याला तीन दिवसांपुर्वीच भूकंपाचे मध्यम तीव्रतेचे तीन धक्के बसले होते.
ते धक्के नागालॅंडलाही जाणवले. भुगर्भ वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार ईशान्य भारताचा सारा भाग सेस्मीक मॅपच्या झोन पाच मध्ये येतो; त्यामुळे या भागाला नेहमीच अशा स्वरूपाचे धक्के जाणवत राहणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.