नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून भारताच्या उत्तर भागात भूकंपाच्या धक्क्यांनी हादरून गेला आहे. मागील महिन्यातच दिल्लीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा देशात भूकंप झाला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी भूकंपाचे हादरे बसले आहेत. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.0 इतकी नोंद करण्यात आली आहे.
An earthquake of magnitude 4.0 on the Richter scale struck Jammu and Kashmir at 1010 hours today: National Center for Seismology
— ANI (@ANI) April 12, 2023
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार सकाळी १०.१० वाजता भूकंपाचे धक्के बसले आहेत.भूकंपाचे धक्के जाणवताच लोक भीतीने घराबाहेर पडले आणि लोकांमध्ये एकच गोंधळ उडाला.
गेल्या महिन्यातही उत्तर भारतात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते त्यामुळे सगळेच घाबरले होते. त्यानंतर पुन्हा एकदा असेच धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.