अहमदाबाद : चौदा तासात गुजरातला भुकंपाचे तीन सौम्य धक्के बसले आहेत.शनिवारी सायंकाळपासून हे धक्के बसायला सुरूवात झाली. शनिवारी सायंकाळी एक आणि रविवारी दोन धक्के बसले. त्यातला मोठा धक्का रविवारी सकाळी 8 वाजून 35 मिनीटांनी बसला, रिश्टर स्केल वर याची तीव्रता 3.3 इतकी नोंदवली गेली.कच्छ जिल्ह्याच्या भागात त्याची तीव्रता जाणवली. त्या भुकंपाचा केंद्र बिंदु कच्छ जिल्ह्याच्या भचाऊ पासून 11 किमी अंतरावर होता.
तिसरा धक्का सायंकाळी 7 वाजून 24 मिनीटांनी बसला. त्याची तीव्रता तीन रिश्टर स्केल इतकी होती. तथापी यात कोणतेही नुकसान झाल्याची नोंद नाही. मात्र ठराविक अंतराने जाणवलेल्या या धक्क्यांमुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती.