शिमला -हिमाचल प्रदेशसह आजूबाजूच्या राज्यांना भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या नैसर्गिक आपत्तीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी लोकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 4.2 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती.
शुक्रवारी पहाटे 4 वा. 32 मिनिटांनी धक्का जाणवल्याची माहिती भूकंपमापन कार्यालयातील अधिकाऱ्य़ांकडून देण्यात आली. या भूकंपाचे केंद्र मंडी जिल्हय़ात असल्याचे सांगण्यात आले. या भूकंपामुळे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.