वाघोली – असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी असलेल्या ई श्रम कार्ड वरदान ठरत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शांताराम कटके यांनी केले.
वाघोली मधील गरजू नागरिकांसाठी मोफत ई श्रम कार्ड वाटपाचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शांताराम कटके व नागेश भाऊ पवार मित्रपरिवार यांच्या वतीने राबवण्यात आला होता. यावेळी कटके बोलत होते.
यावेळी कटके यांनी सांगितले की असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी असलेल्या ई श्रम कार्ड योजनेचे अनेक फायदे आहेत. सरकारी योजनांचा लाभ, आर्थिक मदत व विमा यासारख्या गोष्टींसाठी ई श्रम कार्ड चा उपयोग होतो. कामगारांना या योजनेचा लाभ घेता यावा या हेतूने वाघेश्ववर नगर, वाघोली परिसरात मोफत ई श्रम कार्ड वाटपाचा महत्वपूर्ण कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी तब्बल ५०० नागरिकांना ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले. या प्रसंगी अनंत बिगर शेती ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे चेअरमन सोमनाथ आव्हाळे, शनि शिंगारे, गणेश हरगुडे, दीपक भंडलकर, सागर गोडसे, अबिद शेख, विजय शिंदे, माणिक विटकर, अक्षय शिंदे, संदीप मोरे, अरविंद क्षिरसागर, अमोल गालफाडे, शिवराम पवार, अशोक राठोड, अक्षय पवार, नाना पोळ, शिवाजी चव्हाण, याकुब पठाण, युसुफ मलिक, सुनील लष्करे, संतोष पवार व सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.