मुंबई: गेल्या दोन महिन्यांपासून देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अनेकजण कोरोनामुळे दिवसरात्र मृत्यूशी झुंज देत आहे. या सर्वात सध्या राज्य सरकार व प्रशासनकडून युध्दपातळीवर उपाययोजना करत आहे.
अशातच सोशलवर एक व्हिडियो व्हायरल होत आहे. तसेच या व्हिडियोला वृत्तमाध्यमांनी सुद्धा प्रसारित केले आहे. व्हिडियोमध्ये आरोग्यमंत्र्यांना जेवणासाठीही वेळ नसल्याचे दिसत आहे. वेळ कमी असल्याने टोपे यांनी औरंगाबाद विमानतळावर गाडीतच जेवण केल्याचा तो व्हिडीओ आहे.
मुंबईला जाण्यासाठी निघालेल्या राजेश टोपे यांनी औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून नाश्ता केला. त्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. राजेश टोपे हे पर्याय नसल्याचंही सांगतात. त्यानंतर औरंगाबादहून ते मुंबईला विमानाने रवाना झाले. राजेश टोपे यांच्या या कर्तव्यतत्परतेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. हा व्हिडियो शेअर करत नेटकऱ्यानी त्यांचे कौतुक केले आहे. त्यांनी या पोस्टवर लिहिले आहे की,’परिस्थिती एवढी वाईट आहे की वेळ वाचवण्यासाठी आरोग्यमंत्रीनां गाडी मध्ये जेवावे लागत आहे कर्तव्यदक्ष अन संवेदनशील महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे साहेब.’
दरम्यान, मंत्री टोपे यांच्या आई शारदा टोपे यांचं मागील वर्षी दु:खद निधन झालं होतं. त्यांच्या निधनानंतर राजेश टोपे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळूनही टोपे काही काळातच कोरोना विरोधाच्या लढाईत पुन्हा सक्रिय झाले होते.