येरवडा – लॉकडाऊन काळात 50 पेक्षा अधिक लोकांच्या उपस्थित नगर रस्त्यावरील हॉटेल हयातमध्ये एक लग्नसोहळा पार पडला. याबाबत आनंद गोयल यांनी येरवडा पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर लग्नाचे आयोजक कपिल राजेश गर्ग, हयात हॉटेलचे इव्हेंट मॅनेजर विशाल तिवारी यांच्या विरुद्ध येरवडा पोलिसांनी खटला भरला आहे. हा विवाहसोहळा दि. 30 जून रोजी पार पडला होता.
आनंद गोयल यांच्या तक्रारीनुसार, या सोहळ्याला 50 पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. याशिवाय या लग्नसोहळ्यानंतर अनेकांना करोनाची लागण झाली होती, तर दोघांचा करोनाने मृत्यू झाला होता.
याबाबत येरवडा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनुस शेख म्हणाले, “लॉकडाऊन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल प्रशासनाला नोटीस बजावली आहे. तर, आयोजकांविरुद्ध खटला भरला आहे’