नवी दिल्ली – लॉकडाउनच्या काळात सर्व कंपन्या हैराण आहेत. त्यांच्यावरील कर्जाचे ओझे वाढत आहेत. मात्र रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी लॉक डाऊनच्या काळामध्ये तासाला 90 कोटी रुपयांची कमाई केल्याची आकडेवारी समोर आली आहे.
सलग नवव्या वर्षी मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. लॉक डाऊनच्या काळात त्यांचे उत्पन्न 2,77,000 कोटी रुपयांनी वाढून 6,58,000 कोटी रुपये झाले आहे.
आयआयएफएल या संस्थेच्या यासंबंधातील अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या रिलायन्स जिओ मध्ये गेल्या काही महिन्यात 20 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे.
त्याचबरोबर रिलायन्स रिटेलमध्येही जवळजवळ एक अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली असून आगामी काळात देश-विदेशातून या गुंतवणुकीत वाढ होण्याची शक्यता आहे.