पंढरपूर – कॉपी करून आलेले डुप्लिकेट नेतृत्व कधीही टिकत नसते. ठाकरी भाषा फक्त आणि फक्त शिवसेनाप्रमुख यांनाच शोभत होती. कोणी पोराने ती वापरू नये, असे म्हणत आमदार शहाजीबापू यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उभा केला आहे.
सध्या आदित्य ठाकरे यांची संवाद यात्रा सुरू आहे. यावरून शहाजीबापू पाटील यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. शहाजीबापू पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्याचे नातू म्हणून महाराष्ट्रभर फिरत आहेत. ते लोकमतातले नेतृत्व म्हणून फिरत नाहीत. त्यांच्या नावामागचे ठाकरे नाव काढल्यास 50 माणसांची सभा देखील ते घेऊ शकणार नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला.
एका बाजूला गद्दार म्हणायचे आणि दुसऱ्या बाजूला या-या कशाला म्हणायचे असा सवाल करत आता आमच्याकडे तुमचे काय काम, कोणीही येणार नाही. तसेच आम्ही ठाकरे कुटुंबाचा आदर करतो, मातोश्रीबाबत आम्हाला प्रेम आहे म्हणून आम्ही ऐकून घेत आहोत. पण आता वेडेवाकडे बोलणे बंद न झाल्यास आम्हालाही उलट्या बाजूने उत्तर द्यावे लागेल, असा इशारा देत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावरच प्रश्न उपस्थित केला.