नवी दिल्ली – देशातील सहा वर्षांवरील दोन तृतीयांश किंवा 67.6 टक्के नागरिकांना करोना होऊन गेला असल्याचे देशव्यापी सर्वेक्षणातून समोर आले असल्याचे सरकारने मंगळवारी सांगितले. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) जून – जुलै महिन्यात केलेल्या चौथ्या राष्ट्रव्यापी सेरो सर्वेक्षणामधून ही बाब उघड झाली आहे. याचा अर्थ अद्याप 40 कोटी जणांना करोनाचा संसर्ग झाला नाही.
यातच, वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण का वाढत आहे यामागचं नेमकं कारण आता IMA या भारतातील डॉक्टरांच्या सर्वोच्च संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जे. ए. जयलाल यांनी मंगळवारी हे मत व्यक्त केल आहे की,”केरळ आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय पर्यटक येत असून, आंतरराज्य वाहतूकही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे या दोन राज्यांत कोरोना संसर्गग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.”
ते पुढे म्हणाले, ‘केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या जास्त असली, तरी त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचा दर राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत खूप कमी आहे,
दरम्यान, सामाजिक, धार्मिक आणि राजकीय मेळावे अथवा समारंभ टाळले पाहिजेत. अनावश्यक प्रवासाला प्रोत्साहन देऊ नये, असे सरकारने स्पष्ट केले. करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी एका करोनाबाधिताचा मृत्यू कोणत्याही राज्यात अथवा केंद्र शासित प्रदेशात झाला नाही, असे राज्यसभेत सांगितल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. मात्र, दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची मागणी अभूतपूर्वरित्या वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.