प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 21 – जिल्हासह विभागात मागील काही दिवसांत झालेल्या पावसामुळे पालेभाज्यांचे नुकसान झाले आहे. परिणामी आवकही घटली आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या भाव तेजीत आहेत. किरकोळ बाजारात पालेभाज्यांचे वाढलेले भाव कायम आहेत. कोथींबीर 25 ते 40 रुपयांनी विक्री केली जात आहे. तर शेपू 25 ते 30 रुपये आणि पाकलची 30 ते 40 रुपयांना गड्डीची विक्री केली जात होती.
मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, करडई, राजगिरा, चुका आणि पालकच्या भावात वाढ झाली आहे. तर केवळ चवळईच्या भावात मात्र घट आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित पालेभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेत स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रविवारी मार्केट यार्डात कोथिंबिरीची एक लाख आणि मेथीची 40 हजार जुड्यांची आवक झाली. घाऊक बाजारात मागील आठवड्याच्या तुलनेत क्तकोथींबीरीच्या भावात तब्बल 15 रुपयांनी, तर पालकाच्या भावातही तब्बल 13 रुपयांनी वाढ झाली आहे. मेथी, शेपू आणि कांदापात प्रत्येकी पाच रुपये, चाकवत तीन रुपये, करडई आणि चुका यांच्या भावात दोन रुपये, तर राजगिजराच्या भावात एक रुपयाने जुडीमागे वाढ झाली आहे. तर, चवळईच्या भावात एक रुपयांनी घट झाली आहे.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : 1500-2500, मेथी : 800-1500, शेपू : 800-1200, कांदापात : 1500-2000, चाकवत : 800-1000, करडई : 600-800, पुदीना : 300-800, अंबाडी : 400-600, मुळे : 1000-1500, राजगिरा : 400-600, चुका : 800-1200, चवळई : 400-600, पालक : 1500-2500.