– राजेंद्र वाघमारे
नेवासा – नागरी सहकारी पतसंस्थांचे जाळे आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट पसरत चाललेले असल्यामुळे व्यावसायिकांच्या अर्थिक नाड्यांवर बोट ठेवून व्यवसायिकांच्या अर्थिक प्रगतीसाठी या नागरी संस्थेंचा सद्यस्थितीत मोठा अर्थिक वाटा असल्यामुळे याचा फायदा व्यावसायिकांसह संस्था चालकांना होत असला तरी या संस्थेंचे मालक ठेवीदारांच्या पैशांवर लँण्ड माफिया बनत चालल्याचे चिञ दिसून येत असून स्वस्तात प्लॉट,जमीनी – खरेदी करुन ‘आयत्या बिळावर नागोबा’ बनत असल्याचे वास्तव चिञ काही संस्थेच्या कारभारातून उघड होतांना दिसून येत आहे.
या नागरी संस्थेवर देखरेख करणाऱ्या प्रशासकिय यंञणा काही संस्था चालकांच्या अर्थिक हितसंबंधामुळे ‘ताटाखालचे मांजरे’ बनत असल्यामुळे ठेवींच्या पैशाच्या जोरावर सर्वसामान्य संस्था चालक घडीतच अब्जोधीश बनले जात असून तालुक्यातील काही नागरी पतपुरवठा करणाऱ्या संस्थेने अनेक ठेवीदारांना चुना लावून संस्था बंद केल्या आहेत ‘त्या’ ठेवीदारांच्या गुंतवणूक केलेल्या खातेदारांनी कष्टाचे पैसे पुन्हा माघारी मिळावे म्हणून सहकार खात्याकडे तक्रारी करुन काही जण हेलपाटे मारुन थकले आहेत तर काही जण यमसदनीही गेलेले आहेत माञ सहकार खात्याकडून त्यांना न्याय मिळाला नसल्यामुळे पैसे गुंतवून पश्चातापाची वेळ त्यांच्यावर ओढावलेली आहे.
तर काही चल्लाख संस्था चालक संस्था कशी जपली असल्याचे दाखवून ‘विना सहकार नाही उद्धार’ या चिकाटीने उभे केली असल्याचा बागुलबुवा उभा करुन चोख कारभार करत असल्याचे दाखवत संस्थेत अर्थिक गफला न करता सरळ कारभार करुन ठेवीदारांच्या भांडवलावर संस्था चालक आता गब्बर बनत चालले अाहेत तालुक्यातील एक संस्था आता ईडीच्या रडावर आल्याचे बोलले जात असून ठेवीदारांच्या रक्कमेतून कायदा घाब्यावर बसवून मनमानी कारभार सुरु असल्यामुळे सहकार खात्याची यंञणा नेमकी करतेय तरी काय ? असा सवालही आता जाणकार मंडळींतून व्यक्त होवू लागला आहे.
नागरी सहकारी पतसंस्थांमुळे छोट्या – मोठ्या व्यावसायिकांना वेळेवर अडचणीच्या काळात पतपुरवठा करुन व्यावसायिकांना या अर्थिक पुरवठ्यामुळे ग्रामिण भागातील उद्योग व्यवसायांची मोठी घडी बसलेली आहे त्यामुळे संबंधित व्यावसायिकांचा ज्या – त्या, संस्थेवर चांगलाच विश्वास बसलेला दिसून येत असून आता व्यायसायिकांच्या विश्वासाचा फायदाही काही संस्था चालक ठेवीदारांच्या गुंतवणूकीच्या पैशांच्या जोरावर चक्क लँण्ड माफिया बनत चालले असल्याचे दिसून येत आहेत ‘पैशांपुढे भूत नाचते’ ही ग्रामिण भागातील प्रचलित म्हण या नागरी संस्थेच्या भोंगळ कारभार करणाऱ्यांना तंतोतंत लागू पडत असून प्रशासनाचा सहकारी विभाग माञ मुग गिळून गप्प कसा ? असा सवालही आता जाणकार मंडळीतून विचारला जात आहे.
नेवासा तालुक्यासह जिल्ह्यात आणि पर्यायाने राज्यासह देशात या काही नागरी सहकारी पतसंस्था व मल्टिस्टेट संस्थेचे जाळे कमी – अधिक फरकाने गल्लीपासून दिल्लीपर्यंत पसरले जात आहे या संस्था उद्योग व्यावसायिकांच्या अर्थिक संकटात मदतीला धावून येत असल्या तरी कायदा धाब्यावर बसवून आपल्या संस्थेत ठेवलेल्या ठेवीदारांच्या पैशांवर काही संस्थेचे अध्यक्ष आता लँण्ड माफिया बनू पहात आहेत कमी कालावधीत संस्था चालक आता करोडोपती कसे बनले याची चौकशी कोण करणार ?
आणि शासनाची यंञणा नेमकी करतेय तरी काय ? असा उद्गिन्न सवालही आता जाणकारांतून विचारला जात आहे.कायदा धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने ठेवीदारांच्या पैशांवर खासगी गुंतवणूक करणाऱ्या संस्था चालकांना नेमका कोणाचा ‘राजाश्रय’ लाभला ? असा सवालही आता जनतेतून चर्चीला जात असून सहकार विभागाने कायदाचे तीन – तेरा वाजविण्याऱ्या संस्था चालकांना रडारवर घेणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांतून व्यक्त केले जात आहे
सहकार खात्याचे वराती मागून घोडे…
अनेक संस्था चालकांकडून अनेकांच्या ठेवीची फसवणूक झालेली आहे ठेवीदारांनी सहकार खात्यापुढे आंदोलनेही केलेली आहे माञ सहकार खाते ‘तारीख पे तारीख’ देवून गोलमाल भूमिका बजावत कायदा धाब्यावर बसविणाऱ्या संस्था चालकांच्या हातची बाहूली बनल्या की काय ? अशी खरमरीत प्रतिक्रियाही काही खातेदारांकडून पुराव्यानिशी सादर केल्या जात असतांना सहकार विभागाने आता उघड्या डोळ्यांनी भूमिका बजावणे गरजेचे असल्याचे मत सुजाण नागरीकांतून व्यक्त केले जात आहे.
‘आयत्या बिळावर नागोबा’
अनेक संस्था ठेवीदारांच्या विश्वासास पाञ ठरलेल्या आहेत त्यामुळे खातेदारही या काही संस्थेमुळे मोठे झालेले आहेत मग कमाईचा पैसाही त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे काही संस्थेत गुंतविलेला आहे आणि मग ठेवीदारांच्या ठेवीच्या पैशांवर रातोराञ भंगारच्या भावात जमिनी खरेदी करुन सोन्याच्या भावात विकल्या जात असल्यामुळे ठेवीदारांचा ‘पैसाही’ शाबुत आणि वरकमाईही थेट संस्था चालकांच्या घरात असा कारभार कायद्याच्या चौकटीच्या विरोधात सध्या सुरु असल्याचे बोलले जात आहे माञ ‘गाढवाच्या मागून आणि साहेबांच्या पुढून कोण जाणार’ ? असा उपरोधिक टोलाही आता जाणकार मंडळीतून व्यक्त केला जात आहे.