‘इंडिया ग्रोथ स्टोरी’ मुळे, आगामी मंदीची आवर्तने ही गुंतवणुकीची संधी (भाग-१)
गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून, व्यवसायातील अशा प्रकारच्या आवर्तानाच्या बदलाचे मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. जरी बाजाराचा अचूक तळ अथवा शिखर ओळखता येत नसेल तरी जे सूज्ञ गुंतवणूकदार बाजाराच्या पुढे जाऊन चक्रीय (cyclical) आंदोलनं ओळखून किंवा त्याबाबत अंदाज बांधू शकतात तेच बाजारात खऱ्या अर्थानं पैसे कमावतात.अगदी ढोबळ मानानं उदाहरण द्यायचं झालं सिमेंट क्षेत्र हे पावसाळ्यादरम्यान मंद असतं तर रंग उत्पादक व लिकर कंपन्या या सप्टेंबर ते जानेवारी दरम्यान जोर धरतात. कच्च्या तेलाच्या किंमती या तेल मार्केटिंग कंपन्यांच्या भावावर आणि बँकेचे व्याजदर हे गृहक्षेत्र व वाहनउद्योगावर उलट परिणाम करताततर जानेवारी ते जून दरम्यान वाढलेली विजेची मागणी वीजपुरवठादार कंपन्यांच्या कामगिरीवर नक्कीच परिणाम करणारी ठरते. तर कांही क्षेत्रांवर चलन विनिमयाच्या दराचा परिणाम होतो, जसे की सॉफ्टवेअर क्षेत्र. अशी अनेक प्रकारे यादी देता येऊ शकेल.
आपण भारतातील आवर्तनांचा (cycles) विस्तृत परंतु थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. स्वातंत्र्यानंतर पहिल्या तीन दशकात – १९५०, ६० व सत्तर – भारताची आर्थिक वाढ खूपच मंद होती. या कालावधीत अर्थव्यवस्था दरवर्षी सरासरी ३.५ टक्क्यांनी वाढली. खाजगी कॉर्पोरेट क्षेत्र तुलनेने खूपच लहान होतं आणि कॉर्पोरेट फायदेशीरता देखील कमी होती. “लायसन्स-परमिट- कोटा राज” आणि अतार्किक करांमुळं कॉर्पोरेट क्षेत्र आणि बाजारातील परतावे हे चलनवाढीच्या दरापेक्षा कमी होते. हे चित्र ऐंशीच्या दशकात बदलू लागलं जेंव्हा उदारीकरणाची मात्रा मिळाली आणि भारतीय अर्थव्यवस्था ५.६ टक्के प्रतिवर्ष अशा उच्च प्रक्षेपक वाढीपर्यंत पोहोचली.या दशकात शेअर बाजारातील परताव्यानं चलनवाढीच्या दरावर व इतर मालमत्ता वर्गांच्या (asset class) परताव्यावर मात केली. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरणामुळे भारतातील आर्थिक आणि व्यावसायिक समीकरणंच बदलली.१९९१ नंतर, मागील २८ वर्षांत ही जीडीपीची वाढ सरासरी साडेसहा ते सात टक्क्यांदरम्यान स्थिरावली आहे.
‘इंडिया ग्रोथ स्टोरी’ मुळे, आगामी मंदीची आवर्तने ही गुंतवणुकीची संधी (भाग-३)
१९९१ मध्ये सुरू केलेल्या उदारीकरणानंतर २८ वर्षांनंतर सुद्धा जीडीपीमधील ही वाढ कायम राहिली व त्यामुळे त्यादरम्यान भारतीय कॉर्पोरेट क्षेत्रात प्रभावशाली वाढ झालीतसंच कॉर्पोरेट फायदेशीरता वाढवण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली. १९९१ मध्ये कॉर्पोरेट क्षेत्राचा असलेला निव्वळ नफा ६४०० कोटी रुपयांवरून वाढून २०१७ सालातील उपलब्ध आकडेवारीनुसार ४ लाख कोटी रुपयांवर गेला आहे आणि त्याचं प्रतिबिंब शेअर बाजाराच्या निर्देशांकात पडलेलं दिसून येतं. जुलै १९९० मध्ये १००० अंशाला स्पर्श करणारा सेन्सेक्स ४० पटीनं वाढून मागील आठवड्यात पुन्हा ४०००० अशांना स्पर्श करून आलाय.