नगर- नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वेमार्ग प्रकल्पातंर्गत पुलतांबा ते कान्हेगाव या ८. ६६ कि .मी. अंतराची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. या पूर्ण मार्गात इलेक्ट्रीक इंजीनचा वापर होत आहे. गेल्या तीन वर्षांपासुन नगर ते मनमाड द्रुतगती (डबललाईन ) रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे . या पुर्वी कोपरगाव ते येवला व येवला ते अंकाई, अंकाई ते अंकाई किल्ला, अंकाई किल्ला ते मनमाड, कोपरगाव ते कान्हेगाव, बेलापूर ते पुणतांबा, बेलापूर ते पढेगाव, निबळक ते वांबोरी या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली. मंगळवारी (दि.२) रोजी डबल लाईन रेल्वे मार्गाची चाचणी घेण्यात आली. आता ऐकूण ११५ कि.मी अंतराची चाचणी पूर्ण घेतल्याची माहिती उपमुख्य अभियंता (बांधकाम) दीपक कुमार यांनी दिली.
मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपूर्ण टप्पा आहे. मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडी चा वेग कमी होता. तसेच सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबा घ्यावा लागत होता. त्यामुळे तासंतास रेल्वे एकाच जाग्यावर थांबुन ठेवावी लागत होती. आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रीक इंजिनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेंचा थांबा आता बंद होणार आहे. पुणतांबा ते कान्हेगाव या द्रुतगती रेल्वे मार्गावरमध्ये गोदावरी नदी वरील लांबी २८८ मीटर व उंची १८ मीटर लांबीचा असलेले सर्वात मोठा पुल बांधण्यात आला आहे. हा रेल्वे पुल बनवण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला.
नगर ते मनमाड रेल्वे द्रुतगती मार्गामधील सर्वात मोठ्या लांबीचा व उंचीचा पूल आहे. तसेच या कामामुळे रेल्वे ताशी १३० प्रति किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे. यावेळी द्रुतगती लोहमार्गाच्या चाचणीसाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी ए. के. पांडे, मुख्य अभियंता राजकुमार वानखेडे, उप मुख्य अभियंता दीपक कुमार, कार्यकारी अभियंता डी. पी. पटेल, कार्यकारी अभियंता संदीप सिन्हा, सहाय्यक कार्यकारी अभियंता आर. जे. गायकवाड, सिनियर सेक्शन इंजिनिअर प्रगती पटेल, सेक्शन इजिनिअर धर्मेंद्र कुमार, सुद्धाशु कुमार, एक्झिकेटिव, इंजिनिअर व आदी उपस्थित होते.
मनमाड ते नगर डबल लाईन (द्रुतगती) रेल्वे मार्गाच्या नव्या टप्प्याची चाचणी मंगळवारी घेण्यात आली. यात रेल्वेगाडीचा नेमका वेग काढला आहे. या महत्त्वकांक्षी कामामुळे नगरला फायदा होणार असुन नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होईल.
दीपक कुमार
उपमुख्य अभियंता (बांधकाम), अहमदनगर