अहमदनगर- २०१९ लोकसभा निवडणुकीत डॉ.सुजय विखे यांनी जोरदार विजय संपादन केल्यामुळे कर्जतमध्ये गुरुवारी पालकमंत्री राम शिंदे यांनी डॉ. सुजय विखेंचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावर यापुढे कोणत्याही प्रकारचे सत्कार नकोत असे विखे यांनी म्हंटले आहे.
सध्या, राज्यासह नगर जिल्हात सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळाची तीव्रता गंभीर आहे. त्यातच धरणांतील पाणीसाठा कमी होत असल्याने सर्वत्र पाणीटंचाईची भीषणता वाढत चालली आहे. आणि अशा परिस्थिती सत्कार सोहळ्यासाठी खर्च न करता आपण तो पैसा दुष्काळ निवारण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करावा. असे आवाहन नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. म्हणाले. मात्र, हा त्यांचा आपल्या जिल्ह्यातील पहिला सत्कार होता.