कोल्हापूर – महाराष्ट्रातील शेतक-यांना दिवसा वीज मिळावी. या मागणीसाठी २२ तारखेपासून बेमुदत आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी करत आहे.
गेल्या ५ दिवसापासून शेतीपंपास दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी कोल्हापूरच्या महावितरण समोर बेमुदत धरणे आंदोलनात सुरु आहे. या मागण्यांसाठी अनेकदा शेतक-यांकडून अनोख आंदोलन केल्याचं पाहायला मिळतं. परंतु आज इचलकरंजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर साप सोडले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या घटनेमुळे महावितरण ऑफिसमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या संपूर्ण घटनेवर शेतकरी म्हणाले,’ग्रामीण भागात शेतीसाठी रात्री लाईट दिली जाते, ती लाईट दिवसा मिळावी ही तिथल्या शेतक-यांची मागणी, पण महावितरण अधिका-यांनी दिवसा लाईट देण्यास नकार दिल्याने आम्ही सर्व शेतक-यांनी अधिकाऱ्यांच्या टेबलाव साप सोडले आहेत.’ असं म्हणत त्यांनी आपल्या मागण्या सरकारला मागितल्या आहे.