आगरतळा – मुसळधार पावसामुळे त्रिपुराच्या मानु, जुरी, काकती नदीची जलपातळी वाढल्याने पूरसंकट निर्माण झाले आहे. पुरामुळे उत्तर त्रिपुरासह उनाकोटि आणि धलाई जिल्हयात सर्वाधिक नुकसान झाले आहे.
शासकीय आकडेवारीनुसार पुरामुळे 1039 घरे वाहून गेली आहेत. पुरामुळे त्रिपुराच्या 8 जिल्ह्यांमधील स्थिती गंभीर झाली असली तरीही अद्याप कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह त्रिपुरा स्टेट रायफल आणि राज्य, जिल्हा प्रशासनाची पथके बचावकार्यात सहभागी झाली आहेत. एनडीआरएफनुसार मानु, जुरी आणि काकती नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.