पुणे – प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये महिलांना, ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो. त्यादृष्टीने करोना कालावधीमध्ये महाराष्ट्र आणि केंद्र शासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे भारतामध्ये महामारी लवकर आटोक्यात आणण्यास मदत झाली, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
मिनिस्टर कौन्सेलर, ब्रिटिश हाय कमिशन श्रीमती कॅथी बज व त्यांच्या अधिकाऱ्यांबरोबर “जग आणि भारतावर कोविड-19 चे परिणाम व त्यावरील उपाययोजना’ याबाबत झालेल्या आंतरराष्ट्रीय
चर्चेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी उपउच्चायुक्त ऍलन गेम्मेल, डेप्युटी मिशन हेड कॅथरिन बर्न, बेथ येट्स, सचिन निखार्गे उपस्थित होते.
जागतिक प्रश्नाकडे पाहताना महिलांच्याही दृष्टिकोनातून पाहावे आणि प्रगतीमध्ये कोणीही पाठीमागे राहू नये, असे सांगत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी बजेटमध्ये तरतूद केली यावेळी कॅथी बज मिनिस्टर कौन्सेलर ब्रिटिश हाय कमिशन यांनी डॉ. गोऱ्हे यांच्या कामाचे कौतुक करत, इंग्लंड आणि भारतामध्ये आयुर्वेदिक प्रॅक्टिससंदर्भात करार झाल्याचे सांगितले.