मुंबई: रामदेवबाबांच्या पतंजली आयुर्वेद कंपनी मार्फत कोरोनील नावाचे जे औषध बाजारात आणले जात आहे त्यातून करोना बरा होत नाही, या औषधाविषयी लोकांची दिशाभूल केली तर सदर कंपनीवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे.
या संबंधात त्यांनी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. त्यात शिंगणे यांनी म्हटले आहे की, कोरोनील नावाचे ओैषध करोनावरील औषध नाही, असे आयुष मंत्रालयानेही स्पष्ट केले आहे. केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे ते औषध आहे असे आयुष मंत्रालयानेही स्पष्ट केले आहे.
या औषधाचे नाव कोरोनील असे ठेवून लोकांची दिशाभूल केली जात आहे. पण या औषधाने करोना बरा होत नाही हे लोकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आयुष मंत्रालयाने पतंजलीला केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे ओैषध म्हणूनच कोरोनील विकण्यास अनुमती दिली आहे.