मुंबई – ज्येष्ठ अभिनेते, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. श्रीराम लागू यांचे पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू होते. दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. अखेर आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी (19 डिसेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) December 18, 2019
दरम्यान,त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर राजकीय नेते मंडळींनी सुद्धा श्रीराम लागू यांच्या निधनाचे दुख व्यक्त करत ट्वीट केले आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही लागू यांच्या निधनानंतर ट्वीट करत असे म्हटले आहे की,’माणसाने कसं अर्थपूर्ण जगायला हवं ह्याचं चिंतन डॉ.लागू ह्यांनी आयुष्यभर केलं आणि त्यातील सामोरं आलेलं वास्तव अप्रतिम पद्धतीने अभिनयातून मांडलं. खऱ्या अर्थाने डॉ. श्रीराम लागू हे ‘सूर्य पाहिलेला माणूस’.आज त्यांचं निधन झालं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे विनम्र श्रद्धांजली.’