नवी दिल्ली- चंद्रयान 2 मोहिमेनंतर आता भारत आणखीन एक मोठ लक्ष्य गाठण्यासाठी काम करत असुन आपल्या आगामी योजनेत भारत अंतराळात स्पेस स्टेशन बनवण्याची योजना आखत असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी आज दिली.
यावेळी बोलताना सिवन म्हणाले की, गगनयान योजनेत भारत अवकाशात माणूस पाठवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असुन ही योजना पुर्णत्वास नेण्यास सर्वात मोठी गरज आहे ती अंतराळात भारताचे स्पेस स्टेशन असण्याची. त्या दृष्टीने भारत आता कामाला लागला आहे. डिसेंबर 2021 पर्यंत अंतराळात स्वबळावर माणूस पाठविण्याचे लक्ष्य भारताचे असुन असे झाल्यास स्वबळावर अंतराळात माणूस पाठवणारा भारत जगातील चौथा देश ठरेल असेही त्यांनी यावेळी नमूद केले.