बुलडाणा – सध्या कांदा काढणीला आला आहे. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढला असून वाढत्या तापमानामुळे कांदा खराब होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजूनही कांदा पडून आहे.
बाजारात कांद्याला फक्त 400 ते 500 रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. तर दुसरीकडे हवामान खात्याने येत्या काही दिवसांत वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर कांदा साठवणुकीचा मोठा प्रश्न उभा आहे, अशा परिस्थितीत मात्र कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ऊन आणि अवकाळीच्या अंदाजामुळे बळीराजा चिंतेत आहे.