पटना: बिहारमध्ये विधानसभा निवडणूकीपूर्वी आरजेडीला मोठा धक्का बसला आहे. 8 विधानपरिष सदस्यांपैकी 5 सदस्य जेडीयू मध्ये सामील झाले आहेत. तसेच राजदचे उपाध्यक्ष रांगवंश प्रसाद सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजदला दोन मोठे धक्के बसले आहेत.
संजय प्रसाद, प्रदर्शन आलम, राधाचंद्र सेठ, रणविजय सिंह आणि दिलीप राय यांनी राजदला राम-राम केला आहे. हे सर्व पक्ष सोडणार म्हणून जोरदार चर्चा सुरु होती. कारण हे सदस्य तेजस्वी यादव आणि पक्षविरोधी वक्तव्य करत होते.