डोर्लेवाडी(प्रतिनिधी) – कोरोनाचे संकट असल्याने पालखी सोहळा पायी जाण्याचा निर्णय शासनाने रद्द केला आहे. यामुळे प्रति देहू समजल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील दिंडीच्या वारकऱ्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकाचे गावातील मंदिरातच पूजन करून पालखी सोहळा साजरा केला.
दरम्यान, करोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून यंदा आषाढी एकादशीची वारी अत्यंत साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वारीची परंपरा खंडित होऊ नये, यासाठी संतांच्या पादुका वाहनाने पंढरपूरला नेल्या जातील, असा निर्णय घेण्यात आला आहे.