दुबई -करोनाचा धोका अद्याप कायम असताना पुढील काही काळ तरी बायोबबलमध्येच खेळाडूंना राहावे व खेळावे लागणार आहे. त्यामुळे या काळात प्रदीर्घ दौऱ्यांचा किंवा मालिकांचा विचार केला जावा, अशी मागणी विराट कोहलीने केली आहे.
अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेसाठी बायोबबलमध्येच खेळाडूंना सातत्याने राहावे लागले व खेळावे लागले. इतका मोठा काळ अशा वातावरणात राहून सातत्याने मालिका व सामने खेळणे खूप कठीण आहे.
त्यामुळे पुढील काळात तरी मालिका लघू असाव्यात प्रदीर्घ नको. आता संघ ही स्पर्धा संपल्यावर थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होत आहे. या मालिकेचा कालावधी किमान 80 दिवसांचा आहे.
इतका मोठा काळ अशा वातावरणातच राहणे प्रत्येकाला शक्य होणार नाही, त्यामुळे याचा गांभीर्याने विचार केला जावा, असेही त्याने सुचवले आहे.