मुंबई – अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने ‘दहाड’ वेब सीरिजमधून डिजिटल डेब्यू केला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. यात सोनाक्षी सब-इन्स्पेक्टर अंजली भाटीची भूमिका साकारत आहे. या मालिकेत राजस्थानची पात्रे दाखवण्यात आली आहेत. सोनाक्षीच्या या वेब सीरिजवर चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी टीका केली आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटातील राजस्थानी पात्रांवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, बॉलीवूड कलाकारांना वाटते की, ते हुकूम… म्हारो… थारो… म्हणत राजस्थानी पात्र बनू शकतात. बाकीचे संवाद ते त्यांच्या पंजाबी, बॉम्बे, तामिळ, कन्नड उच्चारांत बोलू शकतात.”
अग्निहोत्री यांनी पुढे ट्वीटमध्ये लिहिले की, “पोलीस बनण्यासाठी, तुम्हाला फक्त खूप मेकअपसह घट्ट बसणारे खाकी कपडे घालावे लागतील. जर तुम्ही काही राजस्थानी शब्द उच्चारले आणि अल्ट्रा मॉडर्न दिसणाऱ्या गोऱ्या आणि गोंडस शहरी कलाकारांना विनाकारण शिव्या दिल्या, तर प्रेक्षक इतके मूर्ख आहेत की ते कलाकार खरे राजस्थानी आहेत असे त्यांना वाटू लागेल.”
Few observations:
1. Bollywood actors think that by saying हुक़ुम… म्हारो… थारो… they can become Rajasthani characters. Rest of the dialogues they can speak in their Punjabi, Bambaiya, Tamil, Kannada accent.
2. To be a cop you just need to wear tight fitting khaki clothes.…— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) May 13, 2023
यावेळी विवेक अग्निहोत्रींनी सोनाक्षीच्या भूमिकेविषयी देखील संताप व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “राजस्थानच्या कडक उन्हात तुम्ही मेकअपचे इतके थर हाताळू शकत नाही. कृपया तुमच्या पश्चात्त्य चित्रपटांच्या प्रेरणांना राजस्थानमध्ये बसवणे थांबवा. प्रेक्षकांना वेडे समजू नका, मूर्ख तर तुम्ही आहात,” सध्या त्यांच्या ट्वीटची चांगलीच चर्चा रंगली आहे.
हा चित्रपट रिमा कागती यांनी दिग्दर्शित केला आहे. एक्सेल एंटरटेन्मेंट आणि टायगर बेबी प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित ‘दहाड’ हा आठ भागांचा क्राइम ड्रामा आहे. सध्या या वेबसिरिजबाबत संमिश्र प्रतिक्रिया दिल्या जात आहे.